'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने जाणीवपूर्वक अफगाणिस्तानला लक्ष्य केले. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने हे आरोप केले आहेत. पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी आपली प्रतिमा सुधारण्यासाठी अफगाणिस्तानसोबतचा तणाव वाढवला, असा आरोप टीटीपीने केला आहे. या हल्ल्यांमुळे फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली.
टीटीपीच्या 'मुजल्लाह तालिबान' या मासिकाच्या ११ व्या अंकात मुनीरवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. मुनीरने भारतापेक्षा अफगाणिस्तानला एक सोपे लक्ष्य मानले. भारतासोबतच्या मे २०२५ च्या संघर्षात पराभव झाल्यानंतर आणि जगभरातून भारताला मिळणारा वाढता पाठिंबा पाहून त्याने हा मार्ग निवडला. आपले लष्करी यश दाखवणे आणि आपल्या देशावरील आपली पकड आणखी मजबूत करणे हा त्याच्या या निर्णयामागील हेतू होता, असा दावा केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टीटीपीने पाकिस्तानी लष्करी नेतृत्वावर अमेरिकेशी संगनमत करण्याची आपली जुनी प्रथा सुरू ठेवल्याचा आरोप केला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये अफगाण शहरांवर करण्यात आलेले हवाई हल्ले हे बंडखोरी संपवण्यासाठी नव्हते, तर अमेरिकेला खूश करण्यासाठी आणि त्यांच्या चिंता दूर करण्यासाठी होते.
उघड युद्धाची घोषणा
पाकिस्तानने फेब्रुवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 'उघड युद्ध' सुरू असल्याची घोषणा केली. 'ऑपरेशन गज्ब-लिल-हक'चा भाग म्हणून पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानमधील अनेक ठिकाणी हल्ले केल्यानंतर काही तासांतच ही प्रतिक्रिया आली. सीमेपलीकडून झालेल्या 'विनाकारण गोळीबाराला' प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले. दोन्ही देशांमधील २,६११ किलोमीटर लांबीची सीमा 'ड्युरँड लाइन' म्हणून ओळखली जाते, ज्याला अफगाणिस्तान औपचारिकपणे मान्यता देत नाही.
ऑपरेशन सिंदूर
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना गोळ्या घालून ठार केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने पाकिस्तानविरोधात 'सिंधू जल' करार निलंबित करण्यासह अनेक पावले उचलली. ७ मे रोजी, भारतीय लष्कराने पाकिस्तानी हद्दीत प्रवेश करून आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले.
Web Summary : TTP alleges Pakistan targeted Afghanistan after failing against India in 'Operation Sindur'. Field Marshal Munir sought to boost his image by escalating tensions. Pakistan's February attacks on Afghanistan were to appease the US, not quell insurgency. Pakistan declared 'open war' following cross-border fire.
Web Summary : टीटीपी का आरोप है कि 'ऑपरेशन सिंदूर' में भारत से हार के बाद पाकिस्तान ने जानबूझकर अफ़ग़ानिस्तान को निशाना बनाया। फील्ड मार्शल मुनीर ने अपनी छवि सुधारने के लिए तनाव बढ़ाया। फरवरी में पाकिस्तान के हमले विद्रोह को दबाने के लिए नहीं, बल्कि अमेरिका को खुश करने के लिए थे। सीमा पार से गोलीबारी के बाद पाकिस्तान ने 'खुले युद्ध' की घोषणा की।