शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरसाठी पाकिस्तानने दहशतवाद पोसला!

By admin | Updated: October 28, 2015 22:14 IST

काश्मिरमध्ये बंडखोरी करण्यासाठी १९९०च्या दशकात पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबासारख्या संघटनांना पाठिंबा व प्रशिक्षण दिले, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे

लाहोर : काश्मिरमध्ये बंडखोरी करण्यासाठी १९९०च्या दशकात पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबासारख्या संघटनांना पाठिंबा व प्रशिक्षण दिले, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे.‘दुनिया न्यूज’ या येथील वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ म्हणाले, ‘ १९९० च्या दशकात काश्मिरमध्ये स्वातंत्र्यलढ्यास सुरुवात झाली. त्यावेळी लष्कर-ए-तैयबा व ११ किंवा १२ अन्य संघटना स्थापन झाल्या. ते काश्मिरमध्ये जीवाची बाजी लावून लढत होते त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा व प्रशिक्षण दिले.’लष्करचे हाफिज सईद व झकीऊर रेहमान लख्वी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासंबंधीच्या प्रश्नावर मुशर्रफ उत्तर देत होते. मुशर्रफ म्हणाले, ‘सईद व लख्वी यांच्यासारखे काश्मिरी स्वातंत्र्यसेनानी त्यावेळी आमचे ‘हीरो’ होते. नंतर, धर्मावर आधारित बंडखोरीने दहशतवादाचे स्वरूप धारण केले. आता ते (पाकिस्तानातील बंडखोर) येथे स्वत:च्याच लोकांचे मुडदे पाडत आहेत. त्यांना आवर घालून थांबवायला हवे.’ मग सईद आणि लख्वी यांनाही असाच आवर घालायला हवा का, असा प्रश्न विचारला असता जनरल मुशर्रफ यांनी त्यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. (वृत्तसंस्था)१९७९मध्ये पाकिस्तान धार्मिक बंडखोरीच्या बाजूने होते. धार्मिक बंडखोरीची सुरुवातच पाकिस्तानने केली व त्यातूनच (अफगाणिस्तानात घुसलेल्या) सोविएत फौजांशी दोन हात करण्यासाठी जगभरातून बंडखोर सामिल झाले.जसे हीरो, तसेच लोक असतील : भारतनवी दिल्ली : पाक पुरस्कृत दहशतवादाचे समर्थन करणारे आणि हाफीज सईद, लखवी, ओसामा बिन लादेन यांना हिरो ठरविणारे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांना भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. जसे यांचे हिरो तसेच लोकही असतील, असा टोला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी लगावला आहे. भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या ५४ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना डोवल यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. नागेंद्र स्मृती व्याख्यानमालेत बोलतानाही त्यांनी मुशर्रफांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अतिरेकी कारवायांत अडकून राहू नका. वेळीच न सुधारल्यास अन्यथा पाक कधीही प्रगती करू शकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दक्षिण आशियातील शांततेत भारताची भूमिका हा या व्याख्यानाचा विषय होता. दहशतवादासारखी कृत्ये करणे फायद्याचे असल्याचा पाकचा गैरसमज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)