शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

'त्याने' मृत्यूनंतरचा अनुभव जगासोबत केला शेअर, एक वेगळं विश्व पाहिल्याचा दावा....

By अमित इंगोले | Updated: September 28, 2020 13:39 IST

हजीम नावाच्या सीरियातील व्यक्तीने मृत्यूच्या दारातून परतण्याचा त्याचा अनुभव जगासोबत शेअर केला. त्याने दावा केलाय की, त्याने एक नवीन लौकिक विश्व पाहिलं.

(Image Credit : Google)

मृत्यू होणार हे सर्वांनाच माहिती असतं. मात्र, त्यानंतर आपलं काय होतं याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जातात. जगात सर्वात जास्त मृत्यू कशामुळे होतात? मृत्यूनंतर काय होतं? मानवाची आत्मा कुठे जाते? दुसरं विश्व असतं का? या प्रश्नांची अनेकांना उत्तरे हवी असतात. याबाबत अनेक मुद्दे मांडले जातात. पण ते पूर्णपणे सिद्ध होऊ शकलेले नाहीत. आता तर मृत्यूच्या दारातून परतलेल्या एका व्यक्तीने अजब दावा केलाय. हजीम नावाच्या सीरियातील व्यक्तीने मृत्यूच्या दारातून परतण्याचा त्याचा अनुभव जगासोबत शेअर केला. त्याने दावा केलाय की, त्याने एक नवीन लौकिक विश्व पाहिलं.

ibtimes.co.in ने दिलेल्या वृत्तानुसार, हजीमने NDERF म्हणजेच Near-Death Experience Research Foundation च्या वेबसाइटला त्याचा अनुभव सांगितला. या वेबसाइटवरील त्याचा अनुभव अरबी भाषेत आहे. तो अभ्यासक अहमद हस्सा यांनी इंग्रजीत अनुवादीत केला. ज्यात हजीमने दावा केलाय की, तो एका वेगळ्याच विश्वात जाऊन  पोहोचला होता. अशाप्रकारचं विश्व त्याने कधीही पाहिलं नसल्याचं सांगितलं. तो म्हणाला की, 'मी अचानक एका वेगळ्या लौकिक विश्वात गेल्याचं मला जाणवलं. गुलाबी ढगं असलेल्या एका मोकळ्या ठिकाणी मी होतो. तिथे मेटलचे अनेक बॉक्स गोल फिरत असल्याचं पाहिलं. तसेच तिथे दोन आवाज ऐकू येत होते जे आध्यात्मिक गोष्टी सांगत होते. त्यातील एकाने एका दुसऱ्या व्यक्तीला सांगितले की, 'याची स्मृती नष्ट करा आणि नव्या बॉडीसाठी तयार करा'. त्यानंतर मला एका मेटलच्या गोल बॉक्समध्ये टाकण्यात आलं. हा बॉक्स नंतर गोल फिरू लागला होता. त्यानंतर माझी स्मृती हळूहळू जाऊ लागली होती'.

त्याने पुढे सांगितले की, त्याने कुणाचातरी आवाज ऐकला. ते बोलत होते की, त्याची मानवी विश्वातील वेळ संपली नव्हती. त्यामुळे त्याने परत जाणं गरजेचं आहे आणि त्याला अनेक चांगली कामे करायची आहेत. हजीमने असाही खुलासा केला की, या क्षणांमध्ये त्याने त्याचं शरीर पूर्णपणे सोडलं होतं.  तसेच हा अनुभव त्रास देणाराही नव्हता आणि आनंद देणाराही नव्हता. इतकेच नाही तर त्याने दावा केला की, त्याचे विचार इतर वेळेपेक्षा अधिक वेगाने सुरू होते. 

दरम्यान, मृत्यूच्या अनुभवाबाबत आयुष्यभर अभ्यास करणारे Sam Parnia यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, मृत्यू ही एक प्रक्रिया आहे. तो पांढरा किंवा काळा क्षण नाही. ते म्हणाले की, वेगळ्या विश्वात गेल्यावर मनुष्य बेशुद्ध होतात. त्यांचा मेंदू काम करणं बंद करतो. आणि हेच मनुष्याचं जीवन संपण्याचं लक्षण आहे. Parnia यांच्यानुसार, मृत्यूच्या दारात असताना होणारा भ्रम हा मृत्यूनंतर दुसरं विश्व असल्याचा पुरावा नाही. 

टॅग्स :SyriaसीरियाDeathमृत्यूInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स