शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा पाकपुढे मैत्रीचा हात

By admin | Updated: December 9, 2015 23:29 IST

भारताने पाकिस्तानकडे आज मैत्रीचा हात पुढे केला. दोन्ही देशांसाठी एकमेकांसोबत काम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे सांगतानाच अतिरेक्यांना कुठल्याही स्वरूपात आश्रय देऊ नका

इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानकडे आज मैत्रीचा हात पुढे केला. दोन्ही देशांसाठी एकमेकांसोबत काम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे सांगतानाच अतिरेक्यांना कुठल्याही स्वरूपात आश्रय देऊ नका, असे आवाहन परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. हार्ट आॅफ एशिया संमेलनात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, अतिरेकी कारवाया करणाऱ्या शक्तींना कुठल्याही नावाने, कुठल्याही स्वरूपात आश्रय देण्यात येऊ नये. विशेषत: आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष द्यावे. जग बदलाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यासाठी भारताने पाकिस्तानला विकासासाठी सहकार्य करण्याचा प्रस्ताव दिला. सुषमा स्वराज म्हणाल्या की, भारत एका अशा अफगाणिस्तानची कल्पना करतो जो की, व्यापार, परिवहन, ऊर्जा आणि संचार यांनी परिपूर्ण केंद्र असेल. पाकिस्तानसोबत विकासाच्या वाटेवर पुढे जाण्यासाठी किंबहुना त्यांना सहकार्य करण्यासाठी आमची तयारी तर आहेच; पण तूर्तास अफगाणिस्तानच्या मदतीचा संकल्प तर करू या. दरम्यान, अफगाणिस्तानच्या मुद्यावर बोलताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, त्या देशात अतिरेकी कारवायांचे क्षेत्र आणि तीव्रता यात मोठी वाढ झाली आहे. अफगाणिस्तान सरकारसोबत काम करण्यास, त्यांची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी आम्ही सहकार्य करू. (वृत्तसंस्था)भारत आणि पाकिस्तान परस्पर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची येथे भेट घेतली. यावेळी भारताचे परराष्ट्रसचिव एस. जयशंकर व शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अजीज यांची उपस्थिती होती.सुषमा स्वराज म्हणाल्या की, पाकिस्तानसोबतही आम्ही मैत्रीचा हात पुढे करण्यास तयार आहोत. ती वेळ आता आली आहे की, आम्ही एकत्र काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी आत्मविश्वास आणि समजूतदारपणा दाखविण्याची गरज आहे. व्यापार व सहकार्य मजबूूत करायला हवे. कारण, संपूर्ण जग त्या क्षणाची वाट पाहत आहे. आम्ही त्यांना निराश करायला नको.सार्क परिषद सप्टेंबर २०१६ मध्ये पाकिस्तानात होणार आहे. यापूर्वी जानेवारी २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. वाजपेयींनंतर पंतप्रधान बनलेले मनमोहनसिंगही पाकिस्तानचा दौरा करू इच्छित होते. मात्र त्यांना शक्य झाले नाही.सार्क शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षी पाकिस्तानचा दौरा करतील, असे स्वराज यांनी सांगितले.