शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

"भारताने बदला घेतला...", इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींवर पाकिस्तान नाराज; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:56 IST

इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबिअंतो २६ जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिनानिमित्त आले होते.

२६ जानेवारी रोजी दिल्लीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. जगभरातील दिग्गज नेत्यांनी यावेळी उपस्थिती लावली. यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबिअंतो मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींचा आधीच दौरा ठरला होता. ते आधी भारतात येऊन नंतर २६ च्या सायंकाळी पाकिस्तानसाठी रवाना होणार होते. पण, त्यांनी अचानक दौऱ्यामध्ये मोठा बदल करुन पाकिस्तानला जाण्याचे रद्द केले. यावरुन आता पाकिस्तान भारतावर आरोप करत आहे. 

सावधान! तुमचे स्मार्ट वॉच ठरू शकते जीवघेणे; 'या' गंभीर आजारांचा धोका, धक्कादायक माहिती उघड

राष्ट्रपती प्राबोवो सुबिअंतो हे भारतातून २६ जानेवारी रोजी सायंकाळी पाकिस्तानसाठी रवाना होणार होते. पण, भारताला त्यांचा दिल्लीतून थेट पाकिस्तान दौरा आवडला नाही. भारताने त्यांच्यावर दबाव आणला यामुळे त्यांनी आपल्या दौऱ्यात बदल केले असल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे.

इंडोनेशियाचे पंतप्रधान भारतातून थेट पाकिस्तानमध्ये न जाता आधी मलेशियाला जातील असा निर्णय त्यांच्याच सरकारने घेतला. दुसरीकडे पाकिस्तानला ते असा बदल करतील असा कोणताही अंदाज नव्हता. पाकिस्तानमध्ये त्यांच्या स्वागताची तयारी केली होती. पण, इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अचानक दौरा रद्द केला. याच सर्व खापर पाकिस्तानने भारतावर फोडले आहे. शाहबाज सरकारकडून अजून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. पण, लोकांनी या पद्धतीच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तानी माध्यमात चर्चा

पाकिस्तानी माध्यमात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. पाकिस्तानी युट्यूबर आरजू काझमी म्हणाले की, प्रजासत्ताक दिनासाठी भारताला दुसरा कोणताही पाहुणा मिळाला नाही. त्यांनी २६ जानेवारी रोजी इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केले. तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही २६ जानेवारी रोजी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष इस्लामाबादला येणार असल्याची तयारी सुरू केली होती. त्यांनी सरकारी मंत्री एहसान इक्बाल यांच्यावर स्वागताची जबाबदारी दिली होती.

आरजू काजमी पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारला हे माहित असले पाहिजे की पाकिस्तानने इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींना आधीच फोन केला आहे. असे असूनही, नरेंद्र मोदी सरकारने इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांना जाणूनबुजून भारतात आमंत्रित केले.

"पाकिस्तानने पहिल्यां इंडोनोशियाच्या राष्ट्रपतींना बोलावले आहे हे नरेंद्र मोदी सरकारला माहित होते. असे असूनही नरेंद्र मोदी सरकारने इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांना जाणूनबुजून भारतात आमंत्रित केले, असा आरोप आरजू काजमी यांनी केला. 

आरजू काजमी म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने इंडोनेशियन राष्ट्राध्यक्षांना व्यापाराच्या ऑफर देऊन आणि इतर अनेक प्रकारच्या ऑफर देऊन भारतात आणले असावे. इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनाही असा विचार आला असेल की पाकिस्तानपेक्षा भारतात जाण्यात जास्त फायदा आहे. तिथून तुम्हाला नक्कीच काहीतरी मिळेल. इंडोनेशियाचे राष्ट्रपती भारतानंतरही पाकिस्तानला जाऊ शकले असते, पण भारताने जाणूनबुजून त्यांना तसे करण्याची परवानगी दिली नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndonesiaइंडोनेशियाIndiaभारत