"PM मोदींना फोन करून म्हणालो, 200% टॅरिफ लावेन! 11 महागडी विमानं पडली..."; युद्ध रोखल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यात नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 22:28 IST2026-02-19T22:28:06+5:302026-02-19T22:28:56+5:30
व्हाईट हाऊसमध्ये 'बोर्ड ऑफ पीस'च्या बैठकीत बोलताना पाकिस्ताचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा संदर्भ देत. ट्रम्प म्हणाले, "शहबाज शरीफ यांनी आमच्या चीफ ऑफ स्टाफसमोर कबूल केले, ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवून अडीच कोटी लोकांचे प्राण वाचवले. दोन्ही देशांची विमानं पडत होती."

"PM मोदींना फोन करून म्हणालो, 200% टॅरिफ लावेन! 11 महागडी विमानं पडली..."; युद्ध रोखल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यात नवा ट्विस्ट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्ष रोखल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांना फोन करून आपण २०० टक्के टॅरिफ (कर) लावण्याची धमकी दिली. यानंतरच दोन्ही देशांनी युद्ध थांबवण्यास सहमती दर्शविली, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. एवढेच नाही तर, सुरुवातीला संघर्षादरम्यान पाच लढाऊ विमाने पाडण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. आता ते त्या संघर्षात ११ लढाऊ विमाने पाडण्यात दावा करत आहेत.
व्हाईट हाऊसमध्ये 'बोर्ड ऑफ पीस'च्या बैठकीत बोलताना पाकिस्ताचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा संदर्भ देत. ट्रम्प म्हणाले, "शहबाज शरीफ यांनी आमच्या चीफ ऑफ स्टाफसमोर कबूल केले, ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवून अडीच कोटी लोकांचे प्राण वाचवले. दोन्ही देशांची विमानं पडत होती."
"मी दोघांनाही फोन केला. मी त्यांना (शहबाज शरीफ) चांगले ओळखत नव्हतो, पण मी पंतप्रधान मोदींना चांगले ओळखतो. मी फोन केला आणि म्हणालो, 'मी डील करणार नाही. जर तुम्ही लोक लढत राहिलात आणि हे संपवले नाही तर मी २०० टक्के ट्रॅरीफ लावेन. दोघांनाही लढायचे होते. पण जेव्हा पैशाचा प्रश्न येतो तेव्हा पैशासारखे काहीच नसते. जेव्हा खूप पैसे गमावण्याची वेळ येते तेव्हा ते म्हणाले, 'कदाचित आपल्याला लढायचे नाही.' यानंतर, दोन्ही बाजूंनी युद्धबंदीवर सहमती दर्शविली. दरम्यान, ट्रम्प यांनी दावा केला की संघर्षात ११ लढाऊ विमाने पाडण्यात आली, जी खूप महागडी होती.
भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे -
असा दावा करण्याची ट्रम्प यांचीही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही त्यांनी अनेकवेळा असा दावा केला आहे आणि भारताने तो नेहमीच फेटाळून लावला आहे. कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीने सीजफायर झाले नसल्याचे भारताने सुरुवातीपासूनच स्पष्ट केले आहे.