शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या काळात तरी रेल्वेची ‘स्पेशल’ लूट थांबवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST

हिंगोली : गत दीड-दोन वर्षांपासून पॅसेंजर रेल्वे सुरू नसल्यामुळे प्रवाशांना ‘स्पेशल’ रेल्वे गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ...

हिंगोली : गत दीड-दोन वर्षांपासून पॅसेंजर रेल्वे सुरू नसल्यामुळे प्रवाशांना ‘स्पेशल’ रेल्वे गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात तरी रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करणे गरजेचे झाले आहे.

कोरोना महामारीमुळे २०१९ पासून रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद केल्या आहेत. सद्यस्थितीत कोरोना महामारी कमी झाल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी ‘डेमो’ रेल्वे गाडी प्रवाशांसाठी सुरू केली. परंतु, या गाडीचे भाडे मात्र एक्सप्रेसचे आहे. त्यामुळे हे भाडे सर्वसाधारण प्रवाशांना परवडणारे नाही. उलट ‘डेमो’ काही स्टेशनला थांबत पण नाही. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. अशावेळी रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन...

सध्या हिंगोली रेल्वे स्थानकावरून नरखेड ते काचीगुडा, अमरावती ते तिरुपती, कोल्हापूर ते नागपूर, नांदेड ते जम्मूतावी, नांदेड ते गंगानगर, पूर्णा ते अकोला आदी पाच ते सहा जवळपास रेल्वे सुरू आहेत. परंतु, या सर्व रेल्वे गाड्या एक्सप्रेसच आहेत. त्यामुळे जास्तीचे भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.

दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार...

सद्यस्थितीत शासनाने अनलॉक केला तरी रेल्वे विभाग मात्र पॅसेंजर गाडी सुरू करण्याचे नाव घेत नाही. २० किलोमीटरला ३० रुपये असे दुप्पट भाडे देऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. रेल्वे विभागाने याचा विचार करणे गरजेचे आहे.

जनरल डबे कधी ‘अनलॉक’ होणार...

हिंगोली येथून जवळपास पाच एक्सप्रेस गाड्या धावतात. परंतु, एकाही गाडीला सर्वसामान्यांसाठी जनरल डबा नाही. सर्वत्र व्यवहार अनलॉक झालेला असताना अजूनही जनरल डबे ‘लाॅक’च आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये एखादा तरी जनरल डबा जोडावा.

‘स्पेशल’ भाडे कसे परवडणार..?

पोळा सणानंतर सर्व सण गोळा होऊ लागतात. त्यामुळे सणावाराला शहराच्या ठिकाणी खरेदीसाठी जावे लागते. अशावेळी खासगी वाहनचालकही दुप्पट भाडे घेत आहेत. प्रवास करावा की नाही, हाच मोठा प्रश्न आहे.

-गजानन वडाणकर, प्रवासी

रेल्वे विभाग पॅसेंजर गाड्याही सुरू करत नाही आणि एक्सप्रेस रेल्वेला जनरल डबाही जोडत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी प्रवास करावा की नाही, हे कळायला मार्ग नाही. रेल्वे विभागाने प्रवाशांची काळजी घेऊन जनरल डब्बा जोडावा.

-बालासाहेब कल्याणकर, प्रवासी

डमी ११४२