शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

Lockdown : हिंगोलीत संचारबंदीच्या पहिल्या दिवशी शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 2:53 PM

हिंगोली जिल्ह्यात ५ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपासून संचारबंदी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देदूध विक्री केंद्र, दूध विक्रेत्यांना सकाळी ७ ते ९ पर्यंत चालू ठेवण्यास मुभा आहे. सर्व बँका केवळ शासकीय कामकाजासाठी चालू राहणार आहेत.

हिंगोली : कोरोचा वाढता कहर पाहता जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी ६ ते १९ ऑगस्ट या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे गुरूवारी शहरातील मुख्य रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट दिसून आला. तर सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान शहरातील काही भागामध्ये यात गांधी चौक व फुलमंडी परिसरात तुरळक गर्दी दिसून आली. हा परिसर वगळता सर्वत्र कडक संचारबंदीचे चित्र दिसून आले. शहरात जागो-जागी कडेकोट पोलीस बंदोस्त असून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना पोलिस प्रसाद देत होते. 

हिंगोली जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे संसर्ग रोखता यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक संचारबंदी लागू केली आहे. त्या अनुषंगाने ६ ऑगस्टपासून हिंगोली जिल्ह्यात संचारबंदी लागू झाली असून १९ ऑगस्टपर्यंत जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी काटकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हिंगोली शहरातील मुख्य रस्ते संचारबंदीमुळे सामसूम होते. शहरातील अग्रसेन चौक, बसस्थानक परिसर, इंदिरा  गांधी चौक तसेच गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व जवाहर रोडवर यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त दिसून आला. 

शहरात उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी हजर होते. हिंगोली जिल्ह्यात ५ आॅगस्टच्या रात्री १२ वाजेपासून संचारबंदी सुरू झाली आहे. संचारबंदी कालावधीत दूध विक्री केंद्र, दूध विक्रेत्यांना सकाळी ७ ते ९ पर्यंत चालू ठेवण्यास मुभा आहे. तसेच सर्व बँका केवळ शासकीय कामकाजासाठी चालू राहणार आहेत. बँक, शासकीय  अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र जवळ ठेवून कार्यालयीन वेळेत ये-जा करण्यास मुभा राहील. फक्त खाजगी रुग्णालयास संलग्न औषधी दुकाने रुग्णालय वेळेप्रमाणे तर आपत्कालीन परिस्थितीत आवश्यकतेनुसार औषधी दुकानांना चालू ठेवण्यास मुभा आहे. पत्रकार व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी वर्तांकन व कार्यालयीन कामकाजासाठी ये-जा करण्यास मुभा राहील. परंतु ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली