शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST

हिंगोली: लसीकरणानंतर ताप न आल्यास लसीवर विश्वास बसेना झाला आहे; परंतु तसे काही नाही. ताप येवो अथवा न येवो. ...

हिंगोली: लसीकरणानंतर ताप न आल्यास लसीवर विश्वास बसेना झाला आहे; परंतु तसे काही नाही. ताप येवो अथवा न येवो. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस कोरोनावर मात करणाऱ्या आहेत. तेव्हा नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ११ हजार ७२४ एवढे लसीकरण झाले आहे. यामध्ये कोविशिल्डचे ३ लाख २७ हजार ६२४ तर कोव्हॅक्सिनचे ८४ हजार १०० डोसचा समावेश आहे. यापैकी पहिला डोस ३ लाख २१ हजार २३० तर दुसरा डोस ९० हजार ४९४ एवढा झाला आहे. १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीची तिसरी लाट लक्षात घेता नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लस घ्यावी. बाजारपेठेत जातेवेळेस मास्क व सामाजिक अंतराचे भान ठेवावे. घरी आल्यानंतर सॅनिटायझर व साबनाने हात स्वच्छ धुवावे. घराच्या आसपास स्वच्छता ठेवावी, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.

आतापर्यंत झालेले लसीकरण...

पहिला डोस ३,२१,२३०

दुसरा डोस ९०,४९४

कोविशिल्ड ३, २७,६२४

कोव्हॅक्सिन ८४१००

त्रास झाला तरच परिणामकारक असे अजिबात नाही...

कोविशिल्ड लस असो अथवा कोव्हॅक्सिन लस. या दोन्हीही लस प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आहेत. त्रास झाला तरच त्या परिणामकारक आहेत, असे काही नाही. एखादेवेळेस ताप येऊ शकतो किंवा येणार नाही. थोडेबहुत अंग दुखू शकते; परंतु दोन्ही लस या चांगल्याच आहेत.

डॉ. सचिन भायेकर, जिल्हा लसीकरण अधिकारी.

कोविशिल्डचा त्रास अधिक...

कोव्हॅक्सिन लस घेतली तर ताप येत नाही; परंतु कोविशिल्ड लस घेतली तर ताप येतो; परंतु दोन दिवसांनंतर तो उतरतो. काही वेळेस अंगही दुखते. त्यामुळे कोणती लस घ्यावी, हे कळायला मार्ग नाही, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.

लसीनंतर काहीच झाले नाही...

कोरोना महामारीपासून बचाव व्हावा म्हणून कोविशिल्ड लस घेतली. यानंतर एक दिवस ताप आला. अंगही दुखले; परंतु नंतर मात्र काहीच झाले नाही. नागरिकांनी न घाबरता लस घ्यावी.

-गजानन शिंदे, हिंगोली.

कोरोना होऊ नये म्हणून लस घेतली. पहिल्या व दुसऱ्या डोसला अजिबात त्रास झाला नाही. कुणाला ताप येते तर कुणाला येत नाही. तेव्हा नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे व कोरोनाला पळवून लावावे.

-बालाजी कल्याणकर, हिंगोली.

डमी ११४८