शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

Corona Virus In Hingoli : राजस्थानला जाणारे 300 मजूर हिंगोली-वाशीम चेकपोस्टवर अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 7:30 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असताना हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने अडचण झाली आहे.

ठळक मुद्देकामाच्या शोधात राजस्थानला गेले होते मजूर

कनेरगाव नाका (जि. हिंगोली) : कामाच्या शोधात हैदराबादला गेलेल्या राजस्थानच्या मजुरांचे एक-दोन नव्हे, तब्बल आठ ट्रक कनेरगाव नाका सीमेवर अडकून पडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असताना हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने अडचण झाली आहे.

जवळपास तीनशे ते साडेतीनशे मजुरांची आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरू केले आहे. ठणठणीत असल्याने सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वाशिम प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर त्यांची पुढे रवानगी केली.कामाच्या शोधात राजस्थानमधून मजूर देशाच्या विविध भागात स्थलांतरित होतात. राजस्थानच्या या मजुरांनी सात ते आठ ट्रकद्वारे हैदराबादपासून हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथपर्यंतचे अंतर कापले. त्यांना मध्ये कोणी सीमाबंदीतही अडविले नाही म्हणून की, पर्यायी मार्ग शोधून ते इथपर्यंत आले हे कळायला मार्ग नाही. या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने पोलिसांनी त्यांना अडविले होते. त्यातही आधी एक, मग दुसरा असे सात ते आठ ट्रक दुपारपर्यंत दाखल झाले. त्यामुळे एवढ्या लोकांना कसे ठेवायचे म्हणून पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास सांगितले. तर वाशिम पोलिसांनी त्यांना प्रवेशबंदी असल्याचे कारण सांगून माघारी फिरण्यास सांगितले. त्यामुळे हे ट्रक पुन्हा कनेरगाव नाका चेक पोस्टवर आले आहेत. या ठिकाणी ट्रकधील सर्व मजूर खाली उतरविण्यात आले व त्यांना बाजूला एका ठिकाणी बसविले.

या घटनेची माहिती गोरेगाव येथील ठाणेदारास कळविली. ठाणेदार श्रीमनवार येथे दाखल झाले आहेत. त्याचबरोबर डॉ.नामदेव कोरडे हे आरोग्य पथकासह तपासणी करीत आहेत. तलाठी चौधरीही येथे दाखल झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे हे घटनास्थळी ठाण मांडून आहेत. दुपारी एक वाजेपासून ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत तपासणी संपली नव्हती.ठेवायचे कोठे?या लोकांना आता ठेवायचे कोठे हा प्रश्न निर्माण झाला होता. गावातील शाळेत व्यवस्था करण्यास ग्रामस्थही तयार नव्हते. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याने त्यांना तसेच पुढे पाठवण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी वाशिम येथील प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर ही मंडळी पुढे मार्गस्थ झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली