शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
2
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
3
इन्कम टॅक्स नंतर आता 'या' मोठ्या बदलावर सरकारचा फोकस; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
4
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
5
डीएसएलआरला टक्कर! २०२५ मध्ये गाजले 'हे' टॉप ५ सेल्फी फोन; क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
6
Psycho Killer Poonam: "जसं मुलांना तडफडून मारलं, तशीच भयंकर शिक्षा द्या"; सायको किलर पूनमच्या पतीचं मोठं विधान
7
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
8
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
9
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
10
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
11
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
12
भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...  
13
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
14
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
15
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
16
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
17
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
18
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
19
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
20
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

त्या विषारी कफ सिरपमध्ये कोणते रसायन आढळले? WHO ने दिली महत्वाची माहिती, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:52 IST

भारतात गेल्या काही दिवसांपासून विषारी कफ प्यायल्याने 22 मुलांचा मृत्यू झाला आहे.

भारतात गेल्या काही दिवसांपासून विषारी कफ सिरपमुळे 20-22 लहान मुलांचा मृत्यू झाल्याने देशातील आरोग्य क्षेत्र हादरुन गेले आहे. मृत्यू झालेल्या बहुतांश मुलांचे वय 5 वर्षांपेक्षा कमी आहे. प्राथमिक तपासात या सिरपमध्ये डायएथिलीन ग्लायकोल (DEG) नावाचे अत्यंत विषारी रसायन आढळले आहे. हे रसायन मानक मर्यादेपेक्षा सुमारे 500 पट अधिक प्रमाणात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

WHO चा इशारा 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने या प्रकरणावर सविस्तर अहवाल जारी केला आहे. WHO च्या म्हणण्यानुसार, भारतात तयार करण्यात आलेल्या Coldrif, Respifresh आणि RELIFE या तीन सिरपमध्ये हे विषारी रसायन आढळले आहे. हे सिरप प्रामुख्याने भारतातच विकले गेले असून, त्यांचा अधिकृतपणे निर्यात केलेला पुरावा नाही. मात्र, WHO ने इशारा दिला आहे की, अनौपचारिक मार्गाने काही प्रमाणात हे सिरप विदेशात पोहोचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डायइथिलीन ग्लायकॉल (DEG) चा वापर कशासाठी होतो?

इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, औद्योगिक वापरासाठी महत्त्वाचे रसायन असलेले डायइथिलीन ग्लायकॉल (DEG) हे प्लॅस्टिक, रेजिन, ब्रेक फ्लुइड, ल्युब्रिकंट आणि कृत्रिम धूर तयार करण्यासाठी वापरले जाते. नैसर्गिक गॅसमधील ओलावा काढण्यासाठीही ते उपयोगी ठरते. मात्र हे रसायन अत्यंत विषारी असल्याने अन्न, औषधं आणि कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये याच्या वापरावर बंदी आहे.

DEG चे विषारी स्वरुप 1937 मध्ये समोर आले

तज्ज्ञांच्या मते, फक्त 1 ग्रॅम प्रति किलो शरीरवजन इतकाही डोस जीवघेणा ठरू शकतो. यकृतात जाऊन हे रसायन विषारी संयुगे तयार करते, ज्यामुळे मूत्रपिंड आणि यकृत निकामी होण्याचा धोका वाढतो. विषबाधेनंतर मळमळ, उलटी, कोमा, लकवा आणि अखेरीस मृत्यू अशी लक्षणे दिसतात. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात DEG ला केवळ 0.2 टक्क्यांपर्यंतच परवानगी आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी औद्योगिक रसायनांचा वापर काटेकोर तपासणीशिवाय औषधे किंवा सौंदर्यप्रसाधनांत न करण्याचा इशारा दिला आहे.

WHO च्या मते, या रसायनामुळे किडनी फेल्युअर, न्यूरोलॉजिकल समस्या आणि मृत्यू, यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. सध्या या विषारी रसायनाचा स्रोत शोधणे सुरू आहे.

भारतात कफ सिरपमुळे मृत्यू का झाले?

WHO आणि भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त तपासात असे समोर आले आहे की, औषधांच्या गुणवत्तेच्या तपासणी प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्या आहेत. कायद्यानुसार प्रत्येक औषधाची बॅच तपासणे बंधनकारक आहे, मात्र काही उत्पादक कंपन्यांनी या नियमांकडे कानाडोळा केला. Sresan Pharmaceutical कंपनीच्या Coldrif सिरप मध्ये DEG चे प्रमाण जास्त आढळल्यानंतर उत्पादन थांबवण्यात आले आणि फॅक्टरीही बंद करण्यात आली आहे.

Shape Pharma आणि Rednex Pharmaceuticals यांच्या Respifresh आणि RELIFE सिरपमध्येही मानक मर्यादेपेक्षा अधिक रसायन आढळले आहे. या दोन्ही कंपन्यांवर उत्पादन आणि विक्री बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका डॉक्टरसह कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करुन, पुढील तपास सुरू केला आहे.

भारतासाठी मोठा धक्का 

ही घटना भारताच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का आहे. भारत जगात औषध उत्पादनाच्या क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याचा निर्यात बाजारही प्रचंड मोठा आहे. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या 40% जनरिक औषधांचा पुरवठा भारतातून होतो. तसेच आफ्रिकेतील सुमारे 90% औषधे भारतातून निर्यात होतात. अशा परिस्थितीत, या घटनेमुळे भारताच्या औषध उद्योगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आरोग्य मंत्रालय आणि WHO च्या सूचना

WHO आणि भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांना कफ सिरप आणि सर्दीच्या औषधांचा वापर टाळण्याचा इशारा दिला आहे. अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही नॉन-प्रिस्क्रिप्शन सिरपचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Toxic cough syrup deaths: WHO reveals killer chemical, issues warning.

Web Summary : Contaminated cough syrups caused child deaths in India. WHO identified diethylene glycol in some syrups. Authorities urge caution, halting production and investigating manufacturers. India's pharmaceutical reputation is at stake.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थानDeathमृत्यूdoctorडॉक्टर