शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

काळजी वाढली! देशाची हर्ड इम्यूनिटीच्या दिशेने वाटचाल; ३८ कोटी लोक संक्रमित, रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 18:31 IST

CoronaVirus News & Latest Updates : SAIR मॉडेलनुसार लोकसंख्येच्या तुलनेत भारतात कमी प्रमाणात चाचण्या घेण्यात आल्या. जे लोक कोरोना संक्रमणाचा सामना करत होते पण लक्षणं दिसत नव्हती अशा लोकांना संक्रमणाबाबत कल्पनाही मिळाली नसेल.

देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना रुग्णांनी  ७७  लाखांचा टप्पा पार केला आहे.  दरम्यान कोरोनाच्या प्रसाराबाबत एक चिंताजनक बाब समोर येत आहे. तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार जवळपास  ३८ कोटी लोक कोरोना संक्रमित झाले असून आता देश हर्ड इम्यूनिटीच्या स्थितीकडे वळत आहे. देशात कोरोना संक्रमणाची लाट दिसत असून आता सरकारने कम्यूनिटी ट्रांसमिशन होत असल्याची बाब मान्य केली आहे. आता लक्षण असलेले, नक्षण नसलेले, संक्रमित आणि कोरोनातून बरे झालेले अशा सगळ्या प्रकारच्या  लोकांमध्ये वाढ झाली आहे.

भारतात कोरोना व्हायरसबाबत एसएआयआर म्हणजेच Susceptible asymptomatic infected recovered मॉडेल अंतर्गत एक रिसर्च केला जात करण्यात आला होता. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चकडून प्रकाशित झालेल्या या अभ्यासात सांगण्यात आले आहे की, भारतात एकूण  ३८ टक्के लोक हर्ड इम्यूनिटीच्या स्टेजपर्यंत पोहोचले आहेत. या रिसर्चचा अहवाल मनिंद्रा अग्रवाल, माधुरी कानिटकर आणि एम विद्यासागर यांनी लिहिला आहे. दरम्यान हर्ड इम्यूनिटीच्या स्थितीत भारतातील मोठी लोकसंख्या असली तरी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. 

अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार या रिसर्चमध्ये नमुद करण्यात आले होते की, लॉकडाऊनमुळे कोराना संक्रमणाचा वेग कमी झाला. मार्चमध्ये लॉकडाऊन झालं नसतं तर जूनमध्ये कोरोना संक्रमणाची मोठी लाट पाहायला मिळाली असती.  SAIR मॉडलनुसार लोकसंख्येच्या तुलनेत भारतात कमी प्रमाणात चाचण्या घेण्यात आल्या. जे लोक कोरोना संक्रमणाचा सामना करत होते पण लक्षणं दिसत नव्हती अशा लोकांना संक्रमणाबाबत कल्पनाही मिळाली नसेल. सरकारच्या आकडेवारीनुसार  १७ सप्टेंबरला कोरोनाची लाट दिसून आली होती. राजधानी दिल्लीमध्ये हा वेग २० टक्के जास्त होता.  दिल्लीतील सिरो सर्वेनुसार जवळपास  २४ टक्के लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं होतं. दिलासादायक! भारतात १०० स्वयंसेवकांवर होणार स्पुटनिक-व्ही लसीची चाचणी, सरकारनं दिली परवानगी

SAIR मॉडलवर करण्यात आलेल्या या रिसर्चनुसार लॉकडाऊन करण्यात आलं नसतं तर २० लाखांपेक्षा जास्त लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला असता. एप्रिल ते मे दरम्यान लॉकडाऊनमुळे जवळपास १० लाख मृत्यू टाळता आले. या रिसर्चमधील माहितीनुसार कोरोना संक्रमणाबाबत अजूनही योग्य आकडेवारी उलब्ध झालेली नाही. चिंताजनक! पुढची २० वर्ष कोरोना लसीची गरज भासणार, आदर पुनावालांनी सांगितले कारण...

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत