शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

काळजी वाढली! देशाची हर्ड इम्यूनिटीच्या दिशेने वाटचाल; ३८ कोटी लोक संक्रमित, रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 18:31 IST

CoronaVirus News & Latest Updates : SAIR मॉडेलनुसार लोकसंख्येच्या तुलनेत भारतात कमी प्रमाणात चाचण्या घेण्यात आल्या. जे लोक कोरोना संक्रमणाचा सामना करत होते पण लक्षणं दिसत नव्हती अशा लोकांना संक्रमणाबाबत कल्पनाही मिळाली नसेल.

देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना रुग्णांनी  ७७  लाखांचा टप्पा पार केला आहे.  दरम्यान कोरोनाच्या प्रसाराबाबत एक चिंताजनक बाब समोर येत आहे. तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार जवळपास  ३८ कोटी लोक कोरोना संक्रमित झाले असून आता देश हर्ड इम्यूनिटीच्या स्थितीकडे वळत आहे. देशात कोरोना संक्रमणाची लाट दिसत असून आता सरकारने कम्यूनिटी ट्रांसमिशन होत असल्याची बाब मान्य केली आहे. आता लक्षण असलेले, नक्षण नसलेले, संक्रमित आणि कोरोनातून बरे झालेले अशा सगळ्या प्रकारच्या  लोकांमध्ये वाढ झाली आहे.

भारतात कोरोना व्हायरसबाबत एसएआयआर म्हणजेच Susceptible asymptomatic infected recovered मॉडेल अंतर्गत एक रिसर्च केला जात करण्यात आला होता. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चकडून प्रकाशित झालेल्या या अभ्यासात सांगण्यात आले आहे की, भारतात एकूण  ३८ टक्के लोक हर्ड इम्यूनिटीच्या स्टेजपर्यंत पोहोचले आहेत. या रिसर्चचा अहवाल मनिंद्रा अग्रवाल, माधुरी कानिटकर आणि एम विद्यासागर यांनी लिहिला आहे. दरम्यान हर्ड इम्यूनिटीच्या स्थितीत भारतातील मोठी लोकसंख्या असली तरी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. 

अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार या रिसर्चमध्ये नमुद करण्यात आले होते की, लॉकडाऊनमुळे कोराना संक्रमणाचा वेग कमी झाला. मार्चमध्ये लॉकडाऊन झालं नसतं तर जूनमध्ये कोरोना संक्रमणाची मोठी लाट पाहायला मिळाली असती.  SAIR मॉडलनुसार लोकसंख्येच्या तुलनेत भारतात कमी प्रमाणात चाचण्या घेण्यात आल्या. जे लोक कोरोना संक्रमणाचा सामना करत होते पण लक्षणं दिसत नव्हती अशा लोकांना संक्रमणाबाबत कल्पनाही मिळाली नसेल. सरकारच्या आकडेवारीनुसार  १७ सप्टेंबरला कोरोनाची लाट दिसून आली होती. राजधानी दिल्लीमध्ये हा वेग २० टक्के जास्त होता.  दिल्लीतील सिरो सर्वेनुसार जवळपास  २४ टक्के लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं होतं. दिलासादायक! भारतात १०० स्वयंसेवकांवर होणार स्पुटनिक-व्ही लसीची चाचणी, सरकारनं दिली परवानगी

SAIR मॉडलवर करण्यात आलेल्या या रिसर्चनुसार लॉकडाऊन करण्यात आलं नसतं तर २० लाखांपेक्षा जास्त लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला असता. एप्रिल ते मे दरम्यान लॉकडाऊनमुळे जवळपास १० लाख मृत्यू टाळता आले. या रिसर्चमधील माहितीनुसार कोरोना संक्रमणाबाबत अजूनही योग्य आकडेवारी उलब्ध झालेली नाही. चिंताजनक! पुढची २० वर्ष कोरोना लसीची गरज भासणार, आदर पुनावालांनी सांगितले कारण...

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत