शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर करते भरारी पथक काम

By admin | Updated: November 24, 2014 23:00 IST

वीज चोरी पकडताना ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात वीज आकारणी केली जाते. वीज चोरी पकडणारे भरारी पथक विद्युत वितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करून आकसपूर्ण व्यवहार करते,

काचेवानी : वीज चोरी पकडताना ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात वीज आकारणी केली जाते. वीज चोरी पकडणारे भरारी पथक विद्युत वितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करून आकसपूर्ण व्यवहार करते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
ग्रामीण व शहरी भागात सर्वाधिक वीज चोरी होते. दिवसासह रात्रीलासुद्धा वीज चोरी करण्यामध्ये बड्या लोकांचा अधिक वाटा आहे. गरीब आकडे लावून वीज चोरी करतात. वीज चोरी करणाऱ्यांची नावे त्या परिसरातील लाईनमन व कनिष्ठ अभियंत्यांना माहीत असते. मात्र चोरी करणाऱ्यांकडून महिनावारी रक्कम वसूल करून ते शांत राहतात. मात्र ज्यांच्याकडून वसुली होत नाही, त्यांना उपकार्यकारी अधिकारी किंवा भरारी पथकाच्या माध्यमाने फसविले जाते. शिवाय मोठ्या प्रमाणात बिलाची आकारणी करून धमक्या देवून पैसे उकळले जातात, असा नागरिकांचा आरोप आहे.
२९ आॅक्टोबर रोजी गोंदियाचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशनात व गंगाझरी शाखेंतर्गत येणाऱ्या काचेवानी येथे धाड घालण्यात आली. बरबसपुरा येथे माने परिवारावरही धाड घालण्यात आली. यावेळी लाईनमन व कनिष्ठ अभियंता यांनी केलेल्या चुकीची किंवा गुन्ह्याची नोंद तपासात घेतली नाही. कारवाईप्रसंगी बेरडीपारचे माजी सरपंच गणेश कोल्हटकर व अ‍ॅड. लंकेश चौरे माने कुटुंबीयांच्या घरी होते. मात्र भरारी पथकाने त्यांची साक्ष घेतली नाही. त्यामुळे भरारी पथकाने केलेला तपास योग्य नसून वीज कर्मचारी किंवा अधिकाऱ्याच्या इशारावर करण्यात आल्याचा माने कुटुंबीयांचा आरोप आहे.
माने कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार बरबरपुरा येथे गंगाझरी शाखेचे कनिष्ठ अभियंता अमित चवरे व कंत्राटी कर्मचारी यांनी गावातीलच धर्मराज चौधरी या युवकाला विद्युत खांबावर चढविले. यावेळी तो खांबावरून खाली आदळला. यावेळी कनिष्ठ अभियंता नसला तरी कंत्राटी कर्मचारी पाठविण्याची नैतिक जबाबदारी अभियंत्याची होती. याची पोलिसात तक्रार देण्यात आली नसून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु या प्रकरणाची तक्रार होणार या भीतीने भरारी पथकाची धाड माने कुटुंबीयांवर घालण्यात आली.
माने कुटुंबीयांनी जून २०१४ मध्ये नवीन घराची पूजा केली. त्यावेळी जीर्ण असलेल्या जुन्या घरातील मीटर नवीन घरी हलविण्याचे आदेश कनिष्ठ अभियंता अमित चवरे यांनी लाईनमन बिसेनला दिले होते. लाईनमनने मीटर हलविले, मात्र खांबावरून सर्विस वायर काढला नाही. आपण पुन्हा येवून खांबावरून विद्युत प्रवाह बंद करून देवू, असे बोलून गेले. यावेळी पाहुणे मंडळी व बरबसपुरा येथील माजी ग्रा.पं. सदस्य माणिक कटरे उपस्थित होते.
यानंतर झाडे कापण्याबद्दल व वीज प्रवाह बंद करण्याबद्दल कनिष्ठ अभियंता व लाईनमनला जून महिन्यापासून चार-पाच वेळा सांगण्यात आले. मात्र टलवाटलवी करून दुर्लक्षच करण्यात आले. विद्युत प्रवाह सुरू असलेला सर्व्हिस वायर कार्यरत कर्मचारी, लाईनमन, कंत्राटी कर्मचारी व कनिष्ठ अभियंत्याने तपासून का घेतले नाही? हे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समजून घ्यावे, असे माने कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)