शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

रेल्वे प्रशासनाला २१ वर्षांनंतर सुचले शहाणपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:54 AM

नागपूरवरुन- गोंदियाला येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना जनरल तिकिटावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या आरक्षीत बोगीतून प्रवास करण्यास मध्य रेल्वे विभागाने मनाई केली आहे.

महाराष्ट्र एक्सप्रेसमधील आरक्षित बोगीत बसण्यास मनाई : प्रवासी संतप्त, सर्वच पक्षांचा आंदोलनाचा इशारा, रेल्वेच्या दोन विभागातील वाद लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागपूरवरुन- गोंदियाला येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना जनरल तिकिटावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या आरक्षीत बोगीतून प्रवास करण्यास मध्य रेल्वे विभागाने मनाई केली आहे. आरक्षीत बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर गेल्या आठवडाभरापासून दंडात्मक कारवाई केली जात असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे. कारवाई करण्याचे शहापण रेल्वे विभागाला तब्बल २१ वर्षांनंतर कसे सुचले असा सवाल केला जात आहे. मुंबई-हावडा मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे. येथून दररोज ७० ते ८० रेल्वे गाड्या धावतात. येथे बाजारपेठ व शासकीय कार्यालये असल्याने हजारो प्रवाशी दररोज रेल्वेने ये-जा करतात. गोंदियावरुन नागपूर आणि नागपूरवरुन गोंदिया असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी १९९६ मध्ये महाराष्ट्र एक्सप्रेसच्या नागपूरवरुन गोंदियापर्यंत विस्तार करण्याचा प्रश्न मार्गी लावला.या गाडीला एकूण १९ बोगी असून सुरूवातीपासूनच आरक्षीत बोगीत जनरल तिकिटावर गोंदिया-नागपूर व नागपूर- गोंदिया असा प्रवास करु दिला जातहोता. त्यामुळे प्रवाशांना सुध्दा सुविधा होत होती. विशेष म्हणजे याच गाडीत दुधवाल्यांसाठी एक स्वतंत्र बोगी देण्यात आली. गेल्या २१ वर्षांपासून गोंदिया-नागपूर व नागपूर- गोंदिया असा प्रवास जनरल तिकिटावर आरक्षीत बोगीतून करित होते. पण, तब्बल२१ वर्षांनंतर मध्य रेल्वे विभागाने महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूरवरुन गोंदियाला येणाऱ्या प्रवाशांना जनरल तिकिटावर आरक्षीत बोगीतून प्रवास करण्यास मनाई केली. मागील आठवड्यापासून प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यामुळेप्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. नागपूर रेल्वे स्थानक मध्यरेल्वेमध्ये तर गोंदिया रेल्वेस्थानक दक्षिणपूर्व मध्ये रेल्वे विभागात येतो. महाराष्ट्र एक्सप्रेसने गोंदियावरुन नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षीत बोगीतून प्रवास करण्यास मनाई व कारवाई केली जात नाही. मात्र नागपूरवरुन येणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे रेल्वेच्या दोन विभागातील वादात प्रवाशांचा बळी जात असल्याचा ओरड आहे. त्यामुळे तब्बल २१ वर्षांनंतर रेल्वे प्रशासनाला कारवाई करण्याचे शहापण कसे सुचले असा सवाल केला जात आहे. यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाई करण्याची तरतूद नियमात पूर्वीपासूनच होती. मात्र त्याची अंमलबजावी आता केली जात असल्याचे सांगितले.