शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ३८ गावातील तेंदूपत्ता लिलाव होणार ई-टेंडरिंगने

By admin | Updated: March 26, 2017 00:49 IST

जिल्ह्यातील वनहक्क मंजूर असलेल्या ३८ गावांमधील तेंदूपत्ता संकलनासाठी लिलाव प्रक्रिया न करता एकाच कंत्राटदाराला ठेका देण्याचा ग्रामसभांनी घेतलेला निर्णय....

ग्रामसभांच्या अधिकारावर गदा : एका कंत्राटदाराला काम देण्याचा निर्णय रद्दगोंदिया : जिल्ह्यातील वनहक्क मंजूर असलेल्या ३८ गावांमधील तेंदूपत्ता संकलनासाठी लिलाव प्रक्रिया न करता एकाच कंत्राटदाराला ठेका देण्याचा ग्रामसभांनी घेतलेला निर्णय आदिवासी विकास विभागाने रद्द केला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा ई-टेंडरिंग केले जाणार आहे. मात्र आदिवासी विभागाचा हा निर्णय ग्रामसभांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याची भावनाही व्यक्त होत आहे.यापूर्वी ग्रामसभांनी केलेल्या तेंदुपत्ता विक्रीच्या व्यवहारात जवळपास १ कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली होती. मात्र ग्रामसभा पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या गणितानुसार यावर्षी तेंदुपत्ता विक्रीतून सर्वाधिक नफा मिळणार असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान वनविभागाचे अधिकारीही गावकऱ्यांच्या भूमिकेवर समाधानी नव्हते. त्यांनी तसा अभिप्राय दिला होता. दरम्यान राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे उपसचिव प्रभाकर गावंडे यांनी गेल्या ९ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून जिल्ह्यातील ३८ सामूहिक वनहक मंजूर गावांमध्ये तेंदूपत्ता संकलन आणि विक्रीची प्रक्रिया ई-टेंडरिंगच्या माध्यमातून करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता लवकरच तेंदुपत्ता संकलन व विक्रीची आधी झालेली प्रक्रिया रद्द करून नव्याने ई-टेंडरिंग केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. २० मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात एक बैठक घेतली. त्यात काही गावातील नागरिकांनी आपल्याला अंधारात ठेवून ग्रामसभांनी तेंदुपत्ता ठेक्याची प्रक्रिया केल्याचा आरोप केला.गेल्यावर्षी जिल्ह्यात २९ तेंदूपत्ता युनिट्सच्या लिलावातून १२ कोटी कोटी रुपये महसूल मिळाला होता. मात्र यावर्षी २९ युनिट्सच्या विक्रीतून ३४ कोटी महसूल मिळाला. त्यामुळे पुढील वर्षाकरिता वनहक्क मंजूर ग्रामसभांना तेंदुपत्त्याचा जो दर मिळाला तो कमी असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. वास्तविक शासनाने गु्रप आॅफ ग्रामसभांना वनौपजाच्या विक्रीचे अधिकार दिले असताना शासनाने पुन्हा ई-टेंडरिंग करण्याची घेतलेली भूमिका कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)