शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शॅम्पू-सोड्याने सुरू आहे बसेसची धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST

कपिल केकत (लोकमत विशेष) गोंदिया : बसमध्ये प्रवासादरम्यान बाधितामुळे अन्य प्रवाशाला धोका होऊ शकतो. अशात प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने बसेस ...

कपिल केकत (लोकमत विशेष)

गोंदिया : बसमध्ये प्रवासादरम्यान बाधितामुळे अन्य प्रवाशाला धोका होऊ शकतो. अशात प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने बसेस स्वच्छ ठेवण्यासाठी व कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने बसेसच्या धुलाईची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत गोंदिया आगारातही शॅम्पू-सोड्याने बसेसची धुलाई सुरू करण्यात आली असल्याचे दिसत आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखता यावा, यासाठी राज्य शासनाने लालपरीची चाके थांबविली होती. मात्र, अनलॉकअंतर्गत जिल्हांतर्गत व नंतर आंतरजिल्हा परवानगी देत लालपरीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या प्रवासादरम्यान बाधित व्यक्ती बसलेल्या जागेवरून अन्य प्रवाशालाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेमका हाच धसका घेऊन कित्येक नागरिक एसटीचा प्रवास टाळत असल्याचे म्हणणेही वावगे ठरणार नाही. अशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा, तसेच आपल्या बसेसमधून प्रवास करणारा प्रवासी सुरक्षित राहावा, या दृष्टीने आता परिवहन महामंडळाने बसेस धुलाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

आतापर्यंत बसेसचे सॅनिटायझेशन, तसेच पाणी मारून धुलाई केली जात होती. मात्र, या विशेष मोहिमेंतर्गत बसेसची शॅम्प-सोड्याने चांगली घासून-घासून सफाई करायची आहे, जेणेकरून बसच्या आतमधील व बाहरेचा भाग स्वच्छ होऊन कोरोना विषाणूंचा नाश, तसेच बसमधून येणारा वास व दुर्गंधही नाहीसा होणार. यानुसार, गोंदिया आगारातही मागील ३-४ दिवसांपासून बसेस धुलाईचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

----------------------

दररोज ४ बसेसची धुलाई

गोंदिया आगाराकडे ७१ बसेस आहेत. महामंडळाच्या या उपक्रमांतर्गत आगाराकडून मागील ३-४ दिवसांपासून दररोज ४ बसेसची धुलाई केली जात आहे. यासाठी आगाराने शॅम्पू-साबण व धुलाईचे अन्य साहित्य आणले आहेत. धुलाईसाठी वर्कशॉपमधील ५ कर्मचारी लावण्यात आले असून, आत व बाहेरून बसेसची बारकाईने धुलाई केली जात आहे.

----------------------------------

नागरिकांच्या मनातील भीती दूर होणार

परिवहन महामंडळाने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे बसेसमध्ये प्रवास करायला घेऊन नागरिकांत असलेली भीती दूर होणार आहे. स्वच्छ बसेसमधून प्रवास करताना प्रवासी बिनधास्त राहणार, शिवाय यातून महामंडळाचीही प्रतिमा उंचावणार आहे.