शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वैर संपले, झाली पैशाची बचत

By admin | Updated: December 27, 2015 02:14 IST

जर, जोरू, जमीन बरोबर दारूमुळे वाढणाऱ्या क्षुल्लक वादाचे पर्यावसान मोठ्या वादात होत होते.

तंटामुक्त मोहिमेमुळे फायदा : भांडणांचे प्रमाण झाले कमी, पोलिसांचा ताण हलकागोंदिया : जर, जोरू, जमीन बरोबर दारूमुळे वाढणाऱ्या क्षुल्लक वादाचे पर्यावसान मोठ्या वादात होत होते. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने या झालेल्या गुन्ह्यांना सोडवून पुढे गुन्हे घडू नये यासाठी गावात जनजागृती केली. परिणामी ज्या गावातून वर्षातून ५० तक्रारी पोलीस ठाण्यात जात होत्या, त्या गावातून आता पाच तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत जात नाही. यामुळे दोन्ही पक्षाचा वेळ व पैसा वाचला. तसेच शासनाच्या पैशाचीही बचत झाली.महाराष्ट्र शासनाने गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी १५ आॅगस्ट २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. या मोहिमेसाठी शासनाने निकष ठरवून दिले. या मोहिमेतील निकष पूर्ण करणाऱ्या गावांना शासनाने लोकसंख्येच्या आधारावर रोख रक्कम पुरस्कार म्हणून दिली. या पुरस्कार रकमेतून गावाच्या विकासावर पैसा खर्च करण्यात आला. परंतु तंटामुक्त गावे वादग्रस्त तर नाहीत याचा आढावा घेण्याची शोधमोहीम महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. यासंदर्भात ३ जानेवारी २०१४ ला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून तंटामुक्त गावातील किती गुन्हे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले याचा अहवाल मागीतला आहे. तंटामुक्त गावात घडलेले तंटे, त्यांची संख्या, त्यांचे स्वरुप व त्या गावात नेहमीच तंटे होतात का याची माहिती मागविली आहे. तंटामुक्त झालेल्या गावातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा तेथील लोकसंख्या व गावातील तंटे सोडविण्यासाठी तंटामुक्त समितीने घेतलेला पुढाकार तसेच नवीन तंटे उद्भवू नये यासाठी तंटामुक्त समित्यांनी केलेले प्रयत्न याची इतंभूत माहिती शासनाने मागविली आहे. या माहितीत तंटामुक्त मोहमेमुळे लोकांच्या राहणीमानात सुधार झाला. शासनाने पुरस्कारच्या स्वरूपात दिलेले पैसे गावाच्या विकासावर खर्च करण्यात आले. तंट्यासाठी लागणाऱ्या पैश्याची बचत झाली. आपसी गैरसमज समझोत्यातून दूर करण्यात तंटामुक्त समितीला यश आले. (तालुका प्रतिनिधी)दर तीन वर्षाने प्रोत्साहन पुरस्कार द्यागोंदिया जिल्ह्यात सन २००७-०८ मध्ये ५६ गावे, २००८-०९ मध्ये २६२ गावे, २००९-१० मध्ये २०५ गावे तर २०१०-११ मध्ये ३३ गावे तंटामुक्त झाली. अवघ्या चार वर्षात गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम तंटामुक्त जिल्हा म्हणून पुढे आला. या मोहीमेत पुरस्कार प्राप्त गावे, गावात तंटे उद्भवणार नाही याकडे किती लक्ष घालतात याचा लेखाजोखा शासनाने मागीतला आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यातून आलेल्या माहितीच्या आधारावर तंटामुक्त मोहिमेने किती गावांचा विकास झाला, किती तंटामुक्त गावे शांततेच्या मार्गावर आहे. याची माहिती शासनाला समजली. तंटामुक्त गावातील समित्यांना नेहमी प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने तंटामुक्त गावाचे दर तीन वर्षाने पुनर्मूल्यांकन करून त्या गावांना प्रोत्साहन राशी देण्याचे ठरवावे. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपये बचत होतील. १४ कोटी पुरस्कारातून आमूलाग्र बदलजिल्ह्यात ५५६ ग्राम पंचायत आहेत. यातील ११४ ग्राम पंचायती नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात आहेत. नक्षलग्रस्त भागात शासनाच्या योजनांना प्रतिसाद मिळत नाही. मात्र तंटामुक्त मोहीमेला नक्षलग्रस्त भागातही लोकचळवळ प्राप्त झाली. तंटामुक्त गावे आपल्या गावात जातीय सलोखा राबवित आहेत. या ५५६ गावांना तंटामुक्त बक्षिसापोटी १४ कोटी सात लाख रूपये मिळाले आहेत. या पैश्यातून गावाचा व नक्षलग्रस्त भागात आमूलाग्र बदल झाला आहे. नक्षलवाद्यांचे समर्थक असलेले काही लोक आता पोलिसांचे खबरी झाले आहेत.