शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने गावे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून सरासरी ७७.१० मिमी पावसाची नोंद झाली होती.शनिवारी (दि.२९) सकाळपर्यंत जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सिंचन प्रकल्प आणि नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील गावांना बसला आहे.

ठळक मुद्देडांगोर्ली, कोरणी, कासात मदत कार्य सुरु: आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू दाखल : नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. बाघ इटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोंदिया तालुक्यातील डांर्गोली, काटी, कासा, पुजारीटोला, ब्राम्हणटोला, बिरसोला, जिरुटोला, कोरणी, भद्याटोला या गावांमध्ये तर तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला, रामाटोला, चांदोरी खुर्द गावात पुराचे पाणी साचल्याने ही गावे पाण्याखाली आली आहे. वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.बुधवारी (दि.२६) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारी सकाळपर्यंत कायम होता. तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून सरासरी ७७.१० मिमी पावसाची नोंद झाली होती.शनिवारी (दि.२९) सकाळपर्यंत जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सिंचन प्रकल्प आणि नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील गावांना बसला आहे. डांर्गोली, काटी, कासा, पुजारीटोला, ब्राम्हणटोला, बिरसोला, जिरुटोला, कोरणी, भद्याटोला या गावांमध्ये तर तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला गावात पुराचे पाणी साचल्याने ही गावे पाण्याखाली आले आहे. बाघ इटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडल्याने बाघ आणि वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. डांर्गोली आणि कोरणी, कासा, पुजारीटोला या गावातील अर्धी घरे पाण्याखाली आली होती. ग्रामपंचायत आणि शाळांमध्ये सुध्दा पाणी साचले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना दुसरीकडे पावसाने कहर केल्याने नागरिकांवर नैसर्गिक आणि कृत्रिम संकट ओढावले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने डांर्गोली, काटी, कोरणी, ढिवरटोला या गावांमध्ये मदत कार्य सुरू केले आहे. कोरणी येथील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुरक्षित स्थळी हलविले. तर ढिवरटोला येथील १४० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमूने मदत कार्य सुरू केले होते.२४ महसूल मंडळात अतिवृष्टीजिल्ह्यात मागील चौवीस तासात २५२४.२० मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी ७६.४३ मिमी पाऊस पडला. तर ३३ महसूल मंडळापैकी २४ महसूल मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर