शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

धानाचे पऱ्हे वाढले; बळीराजावर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 7, 2014 00:00 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सडक/अर्जुनी तालुक्यातील बळीराजाला बसत चालला असून दुष्काळसदृश परिस्थितीचे चित्र तालुक्यात निर्माण होऊ पाहत आहे. पाण्याअभावी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या

कोसमतोंडी : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सडक/अर्जुनी तालुक्यातील बळीराजाला बसत चालला असून दुष्काळसदृश परिस्थितीचे चित्र तालुक्यात निर्माण होऊ पाहत आहे. पाण्याअभावी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पऱ्हे वाळले असून बळीराजांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
मागील हंगामात सरासरी धानाचे उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचे दु:ख पचवू न शकणाऱ्या बळीराजावर यंदाही संकटाचे डोंगर निर्माण होण्याची शक्यता आहे. धानाचे मुख्य पीक घेणाऱ्या सडक/अर्जुनी तालुक्यावर सध्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी धानाचे पऱ्हे वाळले आहेत. पावसाचे मृग व आर्द्रा दोन्ही नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना यावर्षीही दुष्काळ सहन करावा लागणार आहे. यावर्षी तरी चांगले पीक येईल या हेतूने महागड्या धानाचे बियाणे घेऊन परिसरातील शेतकऱ्याने भात पिकाचे पऱ्हे भरले आहे. पावसाने आतापर्यंत हजेरी न लावल्यामुळे पऱ्हे पाण्याअभावी मरत आहेत. पऱ्हेच मेल्यामुळे रोवणे कसे करावे, ही चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, अशा शेतकऱ्याने फक्त आपली पऱ्हे जगविली आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय नाही असे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. कोरडवाहू जमिनीत कमी दिवसात निघणाऱ्या धानाची रोवणी केली जाते.
त्या धानाचे रोवणे वेळेवर झाले नाही तर धान्य पिकण्याची शाश्वती नसते. १५ दिवसांपूर्वी पावसाची रिमझीम सुरू झाली होती. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तो मोठ्या उत्साहाने शेतीच्या कामाला लागला होता. यावर्षी पावसाळा चांगला राहील पीक भरपूर येईल, अशी आशा शेतकरी बाळगून होता.
परंतु पावसाने शेतकऱ्याच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. महागडे बी-बियाणे पेरले व नांगरणी-वखरणी केली. त्यामुळे जवळ होता नव्हता तो ही पैसा खर्च झाला आहे. जर वेळेवर रोवणी झाली नाही तर त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जनावरांना पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी दररोज आकाशाकडे पावसाच्या प्रतीक्षेत डोळे लावून पाहत आहे. (वार्ताहर)