शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान

By admin | Updated: March 20, 2015 00:56 IST

जिल्ह्यात २ व ३ मार्च रोजी अवकाळी पाऊस व १६ मार्चच्या रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुन्हा पाऊस व गारपिटी पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठेच नुकसान झाले.

गोंदिया : जिल्ह्यात २ व ३ मार्च रोजी अवकाळी पाऊस व १६ मार्चच्या रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुन्हा पाऊस व गारपिटी पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठेच नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीला घेवून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.जिल्ह्यात २ व ३ मार्च रोजी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेले जवस, लाखोळी, हरभरा, गहू, धान, केळीची बाग, आब्यांची बाग व भाजीपाला पिकांचे मोठेच नुकसान झाले. तसेच १६ मार्चच्या रात्री पुन्हा अचानक पाऊस आल्याने व ठिकठिकाणी मोठ्या आकाराची गारपिटी पडल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानच झाले. केंद्र व राज्य शासनाच्या नितीमुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच निसर्गाच्या कोपामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी खालावत चालली आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानाची आर्थिक भरपाई त्वरित देण्यात यावी, शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे २०० रूपये बोनस, वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई, ग्रामीण भागात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कार्य अविलंब सुरू करण्यात यावे, उच्च प्रतिच्या धानाची कमी केलेली किंमत वाढविण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदन देतेवेळी जिल्हा राकाँ अध्यक्ष विनोद हरिणखेडे, प्रदेश प्रतिनिधी गंगाधर परशुरामकर, तालुका अध्यक्ष कुंदन कटारे, कृउबासचे सभापती चुन्नी बेंद्रे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजू एन. जैन, बाळा हलमारे, जि.प. सदस्य छोटू पटले, जगदीश बहेकार, नरेंद्र तुरकर, जिल्हा ग्राहक संरक्षण अध्यक्ष भूवन रिनाईत, कृउबासचे संचालक तिर्थराज हरिणखेडे, अखिलेश सेठ, पं.स. सदस्य रामू चुटे, तालुका युवक अध्यक्ष मुरली लिल्हारे, पूरणलाल उके, मदन चिखलोंढे, रविंद्र हेमने, रामेश्वर ठकरेले, गंगाराम कापसे, ज्ञानेश्वर चिखलोंढे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.मंगळवारच्या रात्री ९.३० वाजता गोंदिया शहरात जवळपास १० मिनिटे जोरात पाऊस आला. असा पाऊस जिल्ह्याच्या इतर कोणत्याही भागात पडले नाही. त्यापूर्वी सोमवारच्या रात्री १२.२० वाजता जवळपास संपूर्ण जिल्ह्यात कुठे जोराम तर कुठे मध्यम पाऊस आला. सोबतच काही गावांत लहान तर काही गावांत मोठ्या आकाराच्या गारपिटी पडल्या. ज्या गावांत मोठ्या गारपिटी पडल्या तेथे ग्रामस्थांना मोठेच नुकसान झाले.गोंदियापासून पाच किमी दूर रापेवाडा येथे गारपिटींच्या वर्षावामुळे ग्रामस्थांचे मोठेच नुकसान झाले. तेथील वयोवृद्ध ग्रामस्थांनी सांगितले की अर्ध्या किलोपर्यंच्या वजनाच्या गारपिटी त्यांनी गावात पडताना कधीच पाहिले नव्हते. तनस ढिगात सकाळपर्यंत गारपिटी पाहण्यात आल्याचे काही युवकांनी सांगितले.गारपिटींमध्ये घरांवरील कवेलू मोठ्या प्रमाणात फुटले. सिमेंट सिटवरही मोठ्या आकाराचे गारपिटी पडल्यामुळे छिद्र दिसत आहेत. रापेवाडाच्या युवकांनी आंब्यांच्या झाडावरील पडलेल्या कैऱ्या दाखविल्या. तसेच मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.अधिकाऱ्यांनी गावात येवून निरीक्षण करावे व नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे सिफारिश करावी, अशी मागणी रापेवाडा येथील पुनाराम मौजे, गुरूप्रसाद चव्हाण, हौसलाल रहांगडाले, संजय वैद्य, अंकेश येडे, विजय रहांगडाले, मुन्ना तुरकर, हिरालाल पंधरे, राजा नेवारे यांनी केली आहे. चुटिया क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गारपिटी पडल्यामुळे नुकसान झाले आहे. शासनाने पीडित ग्रामस्थांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राकाँपाचे माजी जि.प. सदस्य संजय टेंभरे यांनी केली आहे. गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा, शहारवानी येथेसुद्धा मोठ्या आकाराची गारपिटी पडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. सोमवारच्या रात्री या गारपिटी कवेलू फोडून घरांत पडत होते, त्यावेळी प्रलय आल्यासारखे वाटत होते. रात्रभर ते आपल्याच घरात त्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात सकाळपर्यंत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील देऊळगाव, बोदरा, बोंडगावदेवी, निमगाव, पिपळगाव येथे १२४ घरे नुकसानग्रस्त झाले. महसूल विभागाने २.४० लाख रूपयांच्या नुकसानीचा अंदाज लावला आहे. ग्रीन शेड लावून शिमला मिरची, टमाटर व भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी सांगितले. तर महागाव, गौरनगर व केशोरी गावांत मिरची पिकास मोठाच नुकसान झाल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)