शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभय

By admin | Updated: December 18, 2014 22:57 IST

तालुक्यात जवळपास सतरा ते अठरा विविध शासकीय, निमशासकीय तसेच राष्ट्रीयकृत बँक कार्यरत आहेत. या कार्यालयांत नोकरी करणारे, शेतकरी व व्यापारी यांची विविध कामे असतात.

आमगाव : तालुक्यात जवळपास सतरा ते अठरा विविध शासकीय, निमशासकीय तसेच राष्ट्रीयकृत बँक कार्यरत आहेत. या कार्यालयांत नोकरी करणारे, शेतकरी व व्यापारी यांची विविध कामे असतात. मात्र या संपूर्ण कार्यालयात कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नाही. ते गोंदिया व नागपूर येथे राहून ये-जा करतात. त्यांच्यावरील वरिष्ठ अधिकारी किंवा संबंधित विभागाची कारवाई गुलदस्त्यात आहे.
सदर कर्मचारी सकाळी ९.३० वाजता येणाऱ्या इंटरसिटी रेल्वे गाडीने येतात, अशी अवस्था येथील कार्यरत कर्मचाऱ्यांची आहे. इंटरसिटीच्या नावावर कर्मचाऱ्यांचे चांगले चांगभल होत आहे. एकंदरीत ही गाडी व्यवस्थेच्या दृष्टीने योग्य आहे. आमगाव रेल्वे स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर कर्मचारी जेव्हा उतरतात, तेव्हा जत्रेचे स्वरुप येते. या स्टेशनवर आमगाव, सालेकसा, देवरी या तीन तालुक्यातील कार्यरत कर्मचारी उतरतात.
विशेष म्हणजे सालेकसा व देवरी तालुक्यात जाण्याकरिता काळीपिवळी गाड्या येऊन त्यांना घेऊन जातात. हा ठरलेला कार्यक्रम आहे. यात कोणताही बदल नाही. आमगाव येथे डाक कार्यालय, टेलिफोन, लघुपाटबंधारे विभाग, जि.प. बांधकाम विभाग, बाघ इटियाडोह, तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कृषी विभाग, स्टेटबँक, अर्बनबँक, बँक आॅफ इंडिया, पंचायत समिती, भूमापन कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण बँक असे अनेक कार्यालय आहेत. तेथील अधिकारी व कर्मचारी यांचा वेळापत्रक ठरलेलाच आहे. परतीच्या मार्गाला घड्याळीचे चार वाजले की ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामाकडे लक्ष कमी व घड्याळाकडे जास्त असते.
पहिली रिंग झाली की बरोबर त्यांच्या मोबाईलवर निरोप येतो. तेव्हा कामाचा लगबगीने सारवासारव करुन कर्मचारी कार्यालये सोडतात. काही कर्मचारी गोंदियाचे काम सांगून सरळ स्टेशन गाठून रेल्वेने निघून जातात. तसेच कधी येणारी इंटरसिटी मिळाली नाही तर कार्यालयात उशिरा येतात. तेव्हा स्वत:ला वाचविण्याकरिता कोणते तरी निमित्त सांगून कामाला लागतात. त्यावेळी एखाद्या व्यक्ती काम घेऊन गेला तर खुर्चीखाली काम थंडबस्त्यात असतो. अशी ही दयनीय अवस्था येथील सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयांची आहे.
दुसरी मजेशीर गोष्ट म्हणजे मुख्यालयी राहतो, असे घरमालकांकडून पत्र किंवा भाडे रसिद दाखवून ‘तो मी नव्हेच’ अशा आवेशामध्ये कर्मचारी काम करतात. खरोखर जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यपालन अधिकारी यांना प्रशासनात पारदर्शकता अणावयाची असेल तर वरिष्ठ सर्व कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, तेव्हा ‘दूध का दूध’ व ‘पाणी का पाणी’ सिद्ध होवू शकेल.
(तालुका प्रतिनिधी)