शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्तीमुळे दोन हजार ज्येष्ठ नागरिक झाले सन्मानित

By admin | Updated: October 25, 2014 22:43 IST

ज्येष्ठ नागरिकांना गावात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेच्या बक्षीस विनियोगात जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याचे प्रावधान केले आहे.

गोंदिया : ज्येष्ठ नागरिकांना गावात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेच्या बक्षीस विनियोगात जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याचे प्रावधान केले आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील तंटामुक्त गावात दोन हजारापेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार झाला आहे. महाराष्ट्र शासनाने गावाला शांततेकडून समृध्दीकडे नेण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमलात आली. या मोहिमेंंतर्गत गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून गावाला विकासाच्या वाटेवर नेणारे उपक्रम समित्यांनी राबविले. गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडवून गावातील ज्येष्ठ नागरिकाला आपल्या समस्या समाजापुढे मांडता याव्यात यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तंटामुक्त गाव मोहिमेच्या बक्षीस नियोजन कार्यक्रमात बोलावण्यात येत आहे. आजच्या स्थितीत संयुक्त कुटुंब पध्दती कालबाह्य ठरली आहे. मी, माझी पत्नी व माझी मुले यातच समाधान मानून आई-वडिलांना दुरावणारी मुले आजही समाजात आहेत. या मुलांना आपल्या आई-वडिलांप्रती आपुलकी वाटावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेतला आहे.एक समिती कमीत कमी गावातील पाच ते सहा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांचा सन्मान राखण्यासाठी पावले उचलत आहेत. तंटामुक्तीमुळे वाळीत टाकल्या जाणाऱ्या वृध्दांचा सन्मान झाल्याने ज्येष्ठ नागरिकांचा प्रति गावकऱ्यांचीच नाही तर त्यांचा मुलांमध्येही सन्मानजनक भावना निर्माण करण्यात ही मोहीम यशस्वी राहीली आहे. जिल्ह्यात सन २००७-०८ मध्ये ५६ गावे, सन २००८-०९ मध्ये २६२ गावे, २००९-१० मध्ये २०५ गावे तर उर्वरीत ३३ गावे सन २०१०-११ मध्ये पात्र झाली. या गावांना बक्षिसापोटी लाखो रुपये प्रत्येक गावाला देण्यात आले. यामुळे तंटामुक्त समित्यांनी गावात समाज प्रबोधन करून ज्येष्ठ नागरिकांची गरिमा राखण्यात मोलाची मदत केली आहे. आजघडीला संयुक्त कुटुंब पध्दती कालबाह्य ठरल्याने ज्येष्ठांच्या समस्या वाढल्या आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने जेष्ठ नागरिकांना सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील तंटामुक्त होणारी ५५६ गावे ज्येष्ठांचा सन्मान राखण्यासाठी सरसावली आहे. भविष्यात जेष्ठांच्या समस्या वाढणार असल्याचे पाहून समिती त्या दृष्टीने पाऊल टाकत आहे. (तालुका प्रतिनिधी)