शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा तालुका; कोरोना आला आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वर-खाली होत असून, एकंदर स्थिती आटोक्यात असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे ...

गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वर-खाली होत असून, एकंदर स्थिती आटोक्यात असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, क्रियाशील रुग्णांची संख्या आता बोटावर मोजण्या इतपत उरली आहे. मात्र विशेष बाब म्हणजे, जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट असलेला तिरोडा आता आटोक्यात आला आहे. तिरोडा तालुक्यात आता फक्त ४ क्रियाशील रुग्ण उरले असून, आता लवकरच हा तालुका ‘कोरोनामुक्त’ होईल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण गोंदिया तालुक्यात आढळून आले आहेत. गोंदियानंतर तिरोडा तालुका दुसऱ्या क्रमांकावर होता व हे दोन तालुके जिल्ह्यातील ‘हॉटस्पॉट’ ठरले होते. गोंदिया तालुक्यात आजही सर्वाधिक रुग्णांची नोंद घेतली जात असून, तालुका सुरुवातीपासून आजही हॉटस्पॉट आहे. गोंदिया तालुक्यात आतापर्यंत ७,८१२ बाधितांची नोंद घेण्यात आली असून, आजही दररोज रुग्ण आढळत आहेत. परिणामी, तालुक्यात सर्वाधिक ८६ क्रियाशील रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तिरोडा तालुका असून येथे १,३९६ बाधितांची नोंद आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की, आता तिरोडा तालुक्यात बाधितांचे प्रमाण कमी झाले असून म्हणूनच तालुका आटोक्यात आल्याचे दिसत आहे. आता तालुक्यात फक्त ४ क्रियाशील रुग्ण उरले आहेत व त्यातील २ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत.

उपरोक्त आकडेवारी बघता तिरोडा तालुका नियंत्रणात आलेला दिसून येतो. याशिवाय, जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव या तालुक्यांतही १० च्या आत बाधित रुग्ण असून हे तालुकेसुद्धा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. मात्र आमगाव तालुक्यात बाधितांची संख्या व क्रियाशील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळेच आता आमगाव तालुक्यात १७ क्रियाशील रुग्ण असून जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. अधिक खबरदारी घेतल्यास लवकरच जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होणार यात शंका नाही.

--------------------------------

त्रिसूत्रीवर अंमलबजावणी गरजेची

जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असून दररोज निघणारी बाधितांची संख्या दिलासादायक दिसून येत आहे. मात्र ही संख्या शून्यावर आलेली नाही. म्हणजेच कोरोना पूर्णपणे गेला नसून बघता-बघता मृतांची संख्या १८२ पर्यंत पोहोचली आहे. अशात कोरोना अद्याप जिल्ह्यात असल्याने त्याला पूर्णपणे मूठमाती देण्यासाठी कोरोनाविषयक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी मास्कचा नियमित वापर, शारीरिक अंतराचे पालन व सतत हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करावीच लागणार आहे.