शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या महागाईने मोडले सर्वसामान्यांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

सध्या भाजीबाजारात हिरव्या पालेभाज्यांसह इतर भाजीपाल्याचे दर ५० रुपयांच्या वर आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्या बाहेर जात आहे. टोमॅटो ८० रुपये किलो असून शिमला ८० रुपये किलो, भेंडी ३० रुपये किलो, तोंडुळे ४०, चवळीच्या शेंगा ८० रुपये किलो, फुलकोबी ८० रुपये किलो, लसन १६० रुपये किलो आहे. कुठल्याही भाजीचे दर हे ५० रूपये प्रती किलोच्यावर असल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे.

ठळक मुद्देगृहिणींचे बजेट बिघडले : भाजीपाल्याचे दर कडाडले

लोकमत न्यूज नेटवर्करावणवाडी : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने अनेकांचा रोजगार हिरावला आहे. तर दुसरीकडे महागाईने डोकेवर काढले आहे. मागील आठवडाभरापासून भाजीपाल्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून गृहीणींचे बजेट बिघडले आहे.सध्या भाजीबाजारात हिरव्या पालेभाज्यांसह इतर भाजीपाल्याचे दर ५० रुपयांच्या वर आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्या बाहेर जात आहे. टोमॅटो ८० रुपये किलो असून शिमला ८० रुपये किलो, भेंडी ३० रुपये किलो, तोंडुळे ४०, चवळीच्या शेंगा ८० रुपये किलो, फुलकोबी ८० रुपये किलो, लसन १६० रुपये किलो आहे. कुठल्याही भाजीचे दर हे ५० रूपये प्रती किलोच्यावर असल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे.५०० रुपयांची नोट खर्च झाल्यावर थैलीभर भाजीपाला येत नसल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. तर गृहिणींना महिन्याचे बजेट सांभाळणे कठीण झाले आहे. लसणाचे भाव सुद्धा दर आठवड्यात वाढत आहेत. त्यामुळे भाजीला लसणाचा फोडणी देणे महाग झाले आहे. कोरोनामुळे अद्यापही उद्योग धद्यांची गाडी रुळावर आली नाही. अनेकांच्या हाताला रोजगार नाही. अशात आता वाढत्या महामाईने त्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जीवन जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.भाजीबाजारात गेल्यावर कुठल्याही भाजीपाल्याचे दर ५० रुपयांच्यावरच असल्याने भाजीपाला कसा खरेदी करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजीपाल्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने महिन्याचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. अशात घरखर्च साभाळतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.- उर्मिला बावनथडे (गृहीणी)हिरव्या भाजीपाल्यासह कडधान्याच्या दरात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा स्थितीत कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. वाढत्या महामागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.- राजेश हरिणखेडे.

टॅग्स :vegetableभाज्या