शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने फेरले शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील बरेच शेतकरी खरीप हंगामात हलक्या व जड धानाची लागवड करतात. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी धानाची विक्री करुन उधार उसणवारी आणि दिवाळ सण साजरा करतात. यंदा जून, जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने रोवणीस तोडा विलंब झाला. त्यामुळे जड धान निघण्यास अजून दोन दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र हलके धान निघाले असून बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणी केली असून काहीणी मळणी सुध्दा सुरू केली आहे.

ठळक मुद्देलागवड खर्च कसा निघणार : शेतकऱ्यांवर आली कर्जबाजारी होण्याची वेळ

गोंदिया : जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यात ४० हजार हेक्टरवर क्षेत्रात हलक्या धानाची लागवड करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा कापणी केलेल्या हलक्या धानाला फटका बसला. जवळपास ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीवर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे.जिल्ह्यातील बरेच शेतकरी खरीप हंगामात हलक्या व जड धानाची लागवड करतात. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी धानाची विक्री करुन उधार उसणवारी आणि दिवाळ सण साजरा करतात. यंदा जून, जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने रोवणीस तोडा विलंब झाला. त्यामुळे जड धान निघण्यास अजून दोन दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र हलके धान निघाले असून बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणी केली असून काहीणी मळणी सुध्दा सुरू केली आहे. मात्र मागील आठवड्यात सलग तीन चार दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे धानाच्या कडपा भिजल्याने आणि बांध्यामध्ये पाणी साचल्याने धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस आणि वाऱ्यामुळे हजारो हेक्टरमधील धान झोपल्याने शेतकऱ्यांनी वर्षभर केलेले काबाडकष्ट आणि रक्ताचे पाणी करुन घेतलेल्या पिकावर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणार नसल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा चिंतेचे ढग निमार्ण झाले आहे.कर्जाची परतफेड कशी करणारमाझी पाच एकर शेती असून खरीपात त्यात धानाची लागवड केली होती. यासाठी जवळपास ६५ हजार रुपयांचा लागवड खर्च आला. शेतीसाठी यंदा ५० हजार रुपयांचे कर्ज जिल्हा बँकेतून घेतले. मात्र आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले.त्यामुळे लागवड खर्च भरुन निघणे कठीण असून कर्जाची परतफेड कशी करणार असे निहारीलाल दमाहे म्हणाले.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती