शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

कोटजांभूरा येथे धानाचे पुंजणे जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

आठ दिवसांपुर्वीच चिचगड सहा गावातील ५० हून अधिक शेतकऱ्यांचे ८० पेक्षा अधिक धानाचे पुंजणे अज्ञात इसमांनी जाळले. त्यानंतर पुन्हा १३ शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळण्यात आले. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र यानंतरही धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरूच असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरुच,चिचगड परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचिचगड : देवरी तालुक्यातील धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास धानाचे पुंजणे जाळल्याची घटना घडली.चिचगड परिसरातील कोटजांभूरा येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पुंजणे काही अज्ञात इसमानी जाळले. यात शेतकऱ्यांचे १ लाख ७२ हजार रुपयांचे नुकसान केले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.मागील काही दिवसांपासून चिचगड परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या पुंजण्यांना आगी लावून नुकसान करण्याचा प्रकार घडत आहेत.आठ दिवसांपुर्वीच चिचगड सहा गावातील ५० हून अधिक शेतकऱ्यांचे ८० पेक्षा अधिक धानाचे पुंजणे अज्ञात इसमांनी जाळले. त्यानंतर पुन्हा १३ शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळण्यात आले. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र यानंतरही धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरूच असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी काही शेतकऱ्यांनी शेतावर जागल करणे सुरू केले आहे. आधीच निसर्गाचा फटका सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांवर या प्रकारामुळे पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आणखी दारिद्रयाच्या खाईत लोटण्याचे महापाप काही समाजकंटकाकडून होत असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.शुक्रवारी कोटजांभूरा येथील किसन चनाप,फगन बागडेहरिया आणि भिकाम जुडा या आदिवासी शेतकºयांच्या धानाच्या पुंजण्यांना अज्ञात इसमाने आग लावल्याने यात १ लाख ७१ हजार ७३२ रुपयांचा नुकसान झाले. यामुळे सदर शेतकºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.शेतकºयांनी या घटनेची माहिती तलाठ्याला दिली. तलाठ्याने नुकसानीचे पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यात २ हेक्टर ६० आर क्षेत्रातील भातिपकाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने त्वरीत आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.धानाचे पुंजणे जाळण्याचा हेतू कायचिचगड परिसरातीलच गावांमध्ये मागील काही दिवसांपासून शेतकºयांचे शेतातील धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरू आहे.अद्यापही पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरूच असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रक्ताचे पाणी करुन मोठ्या कष्टाने पीक घेतल्यानंतर त्याची राखरांगोळी केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. तर धानाचे पुंजणे जाळण्यामागील नेमका हेतू काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पोलिसांसमोर आव्हान कायमशेतातील धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरुच असून अद्यापही या प्रकरणातील आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. तर पुंजणे जाळण्याचा प्रकार सुरूच असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या जीव मात्र टांगणीला लागला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfireआग