शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

दीडपट वेतनाच्या प्रतिक्षेत दीड हजार कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST

महाराष्ट्र शासनाने या दीडपट वेतनाच्या मंजुरीला उशीर केल्यामुळे नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या दीड हजार कर्मचाऱ्यांना मागील ५ महिन्यांपासून दीडपट वेतनाची प्रतीक्षा आहे. एका कर्मचाऱ्याचे एका महिन्याकाठी १५ ते २० हजार रूपये दीडपट वेतन वाढले आहे. या ५ महिन्यांचे एका कर्मचाऱ्याचे ७५ हजार ते एक लाख रूपये अद्याप मिळाले नाही. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च, सण-उत्सवाचा खर्च व भविष्याचे नियोजन बघता या रकमेकडे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्दे५ महिन्यांचे वेतन नाहीच : पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नजरा लागून

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षलदृष्ट्या संवेदनशील भागात काम करणाºया अधिकाऱ्यांना दीडपट वेतन देण्याची योजना सुरू करण्यात आली. परंतु सन २०२० या आर्थिक वर्षातील ५ महिन्यांचे दीडपट वेतन पोलीस अधिकारी-कर्मचाºयांना मिळाले नाही. शासनाने मंजुरी न दिल्यामुळे जिल्ह्यातील दीड हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी मागील ५ महिन्यांपासून दीडपट वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत.गोंदिया जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील असून ११४ गावे नक्षलग्रस्त आहेत. नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी ९ सशस्त्र दूरक्षेत्र उभारण्यात आले आहेत. भरनोली, धाबेपवनी, गोठणगाव, बोंडे, मगरडोह, गणूटोला, पिपरीया, बिजेपार व दरेकसा या ७ एओपींमध्ये काम करणारे पोलीस अधिकारी-कर्मचारी केशोरी,नवेगावबांध, देवरी, चिचगड, डुग्गीपार, सालेकसा पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी, नक्षल विरोधी अभियान पथकात काम करणारे अधिकारी-कर्मचारी, बीडीडीएस व सी-६० मध्ये काम करणाऱ्या पथकातील अधिकारी-कर्मचारी अशा दीड हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना दीडपट वेतन देण्यात येते. सर्वच पोलिसांना मिळणारा पगार समान आहे. परंतु नक्षलग्रस्त भागात नोकरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाचा पुन्हा अर्धा भाग जास्त दिला जातो. सन २०२० मधील दीडपट वेतनाची रक्कम पूर्ण मिळाली. मात्र महाराष्ट्र शासनाने या दीडपट वेतनाच्या मंजुरीला उशीर केल्यामुळे नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या दीड हजार कर्मचाऱ्यांना मागील ५ महिन्यांपासून दीडपट वेतनाची प्रतीक्षा आहे. एका कर्मचाऱ्याचे एका महिन्याकाठी १५ ते २० हजार रूपये दीडपट वेतन वाढले आहे. या ५ महिन्यांचे एका कर्मचाऱ्याचे ७५ हजार ते एक लाख रूपये अद्याप मिळाले नाही. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च, सण-उत्सवाचा खर्च व भविष्याचे नियोजन बघता या रकमेकडे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.काम करणाऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्षमहाराष्ट्राच्या पोलिसांनी नक्षल विरोधी केलेल्या कारवाईची प्रशंसा केंद्रातील नेत्यांनी केली. त्यामुळे कौतुकाची थाप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना दिली. ज्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे राज्याचे नाव पुढे जाते त्या काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन उशीर का करते असा प्रश्न पोलीस कर्मचाºयांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Policeपोलिस