शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या संकल्पनांचा विरोधकांकडे अभाव

By admin | Updated: October 5, 2014 23:08 IST

आम्ही सामान्यजणांच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न असो किंवा पुरामुळे खालच्या पुलांना उंच करण्याची बाब असो, ते सर्व प्रश्न आम्ही सोडविण्याचा प्रयत्न केला.

गोंदिया : आम्ही सामान्यजणांच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न असो किंवा पुरामुळे खालच्या पुलांना उंच करण्याची बाब असो, ते सर्व प्रश्न आम्ही सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी विचारतात की रस्ते बनविल्याने विकास होतो काय? सिंचन योजना पूर्ण न होण्याचा आरोप ते करतात. तर काय एकाच रात्रीत मोठमोठे सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जातात काय? विरोधकांंकडे विकासाची कसलीही संकल्पना नाही, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी करून विरोधी पक्षांचा चांगलाच समाचार घेतला. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील लोधीटोला (सावरी), गर्रा खुर्द, गर्रा बु., रावणवाडी, गोंडीटोला, मुरपार, सिरपूर, सिरपूरटोला, मोगर्रा, चारगाव, अर्जुनी येथे निवडणुकीच्या प्रचारासाठी पदयात्रा काढून जनसंपर्क अभियान राबविण्यात आले. घरोघरी जावून नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या. यावेळी अग्रवाल यांनी आपले मत व्यक्त केले. ते विरोधी पक्षांवर आगपाखड करताना पुढे म्हणाले की, सध्याचे भाजपचे उमेदवार हे गोरेगाव तालुक्यातील मोहाडी जि.प. क्षेत्राचे सदस्य आहेत. या क्षेत्रात कटंगी सिंचन प्रकल्पाचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. तेथील पुनर्वसनाची समस्या प्रलंबित आहे. त्यांनी आपल्या क्षेत्रातील नागरिकांसाठी काय केले व काय करणार गोंदियाच्या जनतेसाठी? त्यांना केवळ आरोप करणेच जमते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचे काम केवळ आरोप लावणे व अफवा पसरविणे, एवढेच आहे. ते प्रत्यक्षपणे कसलेही जनहिताचे काम करीत नाही. सन १९९५ ते १९९९ पर्यंत राज्यात भाजप-शिवसेनचे शासन होते. त्यावेळी गोंदिया तालुक्यात काहीतरी चांगले कार्य झाले असेल तर सांगावे. भाजप-शिवसेनेने या तालुक्यात एकही जनहिताचे काम केले नाही. माझ्यावर टिकाटिप्पनी न करता त्यांनी एवढेच सांगावे की, ते गोंदिया कोणते विकासाचे कार्यक्रम राबविणार आहेत? गोंदियाच्या विकासासाठी त्यांचे काय नियोजन आहे? नेत्यांच्या नावावर एकदा भाजपने विजय मिळविले. मात्र नेहमीच हे शक्य नाही. विरोधकांना आपली योग्यता दाखवावी लागेल. जनता यांना योग्यप्रकारे ओळखते. केंद्रासाठी खासदार निवडीचे मुद्दे वेगळे आहेत. परंतु आमदाराची निवड सामान्य माणसाचीच करावी लागेल. जो आमच्यामधील नसून ५० किमी दूरवरील गोरेगाव तालुक्याचा आहे, त्याची निवड कशी करणार? आमदार हा सामान्य माणसाजवळील असावा आणि हे संबंध मी प्रामाणितेने निभवले आहे. या क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी आपली जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, मी आपल्या मतदानाच्या योग्य आहे, असे अग्रवाल म्हणाले. यानंतर माजी जि.प . सदस्य ओमप्रकाश भक्तवर्ती यांनी भारतीय जनता पक्षाचा चांगलाच समाचार घेवून पंजा चिन्हाची बटन दाबून गोपालदास अग्रवाल यांना विजयी करण्याचे आवाहन केले. जिल्हा काँग्रेस सचिव गेंदलाल शरणागत यांनी, गोंदिया तालुक्यात एक लाख २५ हजार पेक्षा अधिक गरजूंना लाभदायी योजनांचा लाभ आ. गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे मिळाल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश रहमतकर, पं.स. सभापती सरिता अंबुले, उपसभापती चमन बिसेन, माजी उपसभापती मनिष मेश्राम, सावरीचे सरपंच चिखलोंडे, माजी सरपंच टेकचंद सिहारे, राधेश्याम गजभिये, जयपाल नाईक, झनक पटले, गमचंद तुरकर, गर्राचे माजी सरपंच मनोज बोरकर, रावणवाडीचे सरपंच कुंजाम, राजेंद्र कटरे, चरण टेंभरे, हरिविठ्ठल ठाकरे, सदाराम येरणे, रघू येरणे, प्रदीप घोडेस्वार, सिरपूरचे सरपंच येरणे, मोगर्राचे सरपंच नागपुरे, चारगावचे सरपंच राधेलाल पटले, राजेश माने, आशिष चव्हाण, वडेगावचे सरपंच देशकर, जे.सी. तुरकर, बकाराम रहांगडाले, अर्जुनीचे उपसरपंच सूर्यप्रकाश भगत आदी उपस्थित होते.