शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

सुट्या फक्त १० दिवसांच्याच

By admin | Updated: November 16, 2015 01:42 IST

बदलत चाललेल्या शिक्षण प्रणालीमुळे चिमुकल्यांच्या पाठीवर दफ्तराचे ओझे वाढत असतानाच आता त्यांच्या सुट्यांवरही गाज पडत आहे.

दिवाळीच्या सुट्यांत कपात : बदलत्या शिक्षण प्रणालीचा परिणाम गोंदिया : बदलत चाललेल्या शिक्षण प्रणालीमुळे चिमुकल्यांच्या पाठीवर दफ्तराचे ओझे वाढत असतानाच आता त्यांच्या सुट्यांवरही गाज पडत आहे. पूर्वी १५-२० दिवस मिळत असलेल्या दिवाळीच्या सुट्या आता जेम-तेम ८-१० दिवसांपासून आल्या आहेत. एकंदरीत या शिक्षण प्रणालीमुळे मात्र आजची पिढी पारंपारिक सणांसोबत नातेसंबंधांपासूनही परावृत्त होत चालली असल्याचे दिसून येत आहे. आजघडीला सर्वत्र इंग्रजी शिक्षणाचा बोलबाला आहे. नर्सरीपासूनच चिमुकल्यांना इंग्रजीचे धडे दिले जात असून मराठी व हिंदी शिक्षणाला बगल दिली जात आहे. हेच कारण आहे की, या शिक्षण प्रणालीत मराठी व हिंदी हा एक विषय बनून राहिला आहे. इंग्रजी शिक्षणाप्रती वाढत चाललेल्या या के्रजमुळे मराठी व हिंदी शाळा ओस पडत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या बदलत्या शिक्षण प्रणालीमुळे शिक्षण क्षेत्रातच पूर्णपणे ढवळाढवळ झाली असून याचा परिणाम मात्र जुन्या परंपरा व सणांवर पडत असल्याचे दिसत आहे. त्याचे कारण असे की, हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण दिवाळी आहे. पाच दिवसांच्या या सणाची धामधूम तुळशी विवाहापर्यंत चालत होती. वर्षातील सर्वात मोठा हा सण फक्त हिंदू धर्मीयच साजरा करीत नसून सर्वच धर्मीयांचा हा सण म्हणून ओळखला जातो. यामुळेच या सणानिमित्ताने सहा माही परिक्षा घेतल्यावर दिवाळीच्या १५-२० दिवसांच्या सुट्या दिल्या जात होत्या. दिवाळीच्या या सुट्यांत आपल्या घरी दिवाळी साजरी केल्यावर मुले आपल्या मामाच्या घरीही जाऊन सुट्यांचा मनसोक्त आनंद घेत होते. काही वर्षांपूर्वी दिवाळी एक पर्वणी म्हणूनच विद्यार्थ्यांना लाभत होती. मत्र कालांतराने तीमाही व सहामही परिक्षांची जागा सेमीस्टर पॅटर्नने घेतली. शिक्षण प्रणाली बदलत गेल्याने पुस्तकांचा खच चिमुकल्यांच्या डोक्यावर आला व त्यांच्या पाठीवर दफ्तराचे ओझे वाढले. अभ्यासाचा हा ताप एवढा वाढला की आता विद्यार्थ्यांना खेळणे-बागडण्यासाठी वेळच मिळत नसून पुस्तकातच डोके खुपसून ठेवावे लागत आहे. शिवाय सुट्यांतही होमवर्क दिला जात असल्याने सुट्या नावापुरत्यात ठरू लागल्या आहेत. शिवाय सुट्यांत कपात केली जात असून आता जेम-तेम ८-१० दिवसांच्या सुट्या दिल्या जात आहेत. कमी-कमी होत चाललेल्या या सुट्यांमुळे विद्यार्थ्यांत मात्र नाराजी दिसून येत आहे. तेवढीच नाराजी शिक्षकवर्गातही असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थी शिक्षणात तरबेज होत असले तरी ते आपली परंपरा, सण व नातेवाईकांपासून दुरावत आहेत. (शहर प्रतिनिधी)