शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

अभियानातून कार्यक्षमता वाढविणार

By admin | Updated: December 27, 2014 22:53 IST

आजही परिसरातील जमिनीची सुपीकता पूर्णत्वाकडे नाही. एकूण क्षेत्राच्या ४५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. कोरडवाहू शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न वाढविण्याकरिता शासनाने कोरडवाहू

काचेवानी : आजही परिसरातील जमिनीची सुपीकता पूर्णत्वाकडे नाही. एकूण क्षेत्राच्या ४५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. कोरडवाहू शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न वाढविण्याकरिता शासनाने कोरडवाहू अभियान सुरू केला आहे. हे अभियान तिरोडा तालुक्यात केवळ एका गावापुरते मर्यादित न ठेवता सर्व महसूल मंडळात म्हणजे चार ते पाच ठिकाणी हे अभियान राबविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
२०१४-१५ पासून २०१७ पर्यंत कोरडवाहू शाश्वत शेती कार्यक्रमाऐवजी कोरडवाहू शेती अभियान सुरु केले आहे. या अभियानात तालुक्यातून केवळ एका गावाची निवड करुन या गावात प्रात्यक्षिकातून सुधारित शेती केली जात आहे. परंतु संपूर्ण तालुक्यातून एकच गाव असल्याने या अभियानाचा लाभ फारसा होणार नाही. या अभियानाला यशस्वी करायचे असेल तर तालुक्याच्या राजस्व मंडळ क्षेत्रात हे अभियान राबविणे गरजेचे आहे, असे शेतकऱ्यांनी लोकमतजवळ बोलून दाखविले आहे.
कोरडवाहू शेती अभियानाच्या प्रमुख उद्देश म्हणजे कोरडवाहू शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे, मृद जलसंधारणासह साखळी बंधारे व शेततळी या माध्यमातून सरंक्षित सिंचनाच्या सुविधा पुरविणे, सूक्ष्म सिंचनाचा वापर करून सिंचनाची कार्यक्षमता वाढविणे, यांत्रिकीकरणारव्दारे उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे, शेतमालास योग्य भाव मिळण्याकरिता नियंत्रित शेती, प्राथमिक कृषी प्रक्रिया व पणन सुविधा निर्माण करणे, तंत्रज्ञानाने पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मनुष्यबळाचा प्रचार व प्रसार करणे आणि प्रशिक्षण, शेतीशाळा, अभ्यास दौरे या माध्यमातून मनुष्यबळाचे सक्षमीकरण करणे आहेत.
शेतकऱ्यांची आजही स्थिती दयनिय आहे. कितीतरी वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकार विविध योजनांची आखणी करून सुविधा उपलब्ध करीत आहे. तरीही शेतकऱ्यांची अवस्था हवी तशी सुधारली नाही. यात काही प्रमाणात शेतकरी, शासन आणि योजना राबविणारी यंत्रणा जबाबदार असल्याचे शेतकरी बोलतात. शासन योजना तयार करते मात्र योजना तयार करतेवेळी कृषी विभाग शासनाला योग्य सल्ला देत नाही. अर्थात योजना तुटक स्वरूपात राबविल्या जातात. त्यामुळे शेतकरी त्या पूर्ण करू शकत नसल्याचे बोलले जाते.
शेतकऱ्यांना एवढी वेळ आणि पैसा नाही की दूर अंतरावर जाऊन प्रात्यक्षिकांचे अवलोकन करू शकेल. कृषी विभागाकडे योजना आल्या, त्यातून कितीतरी योजना किंवा निधीतील रक्कम कोणत्या ना कोणत्या स्वरुपातून आपल्या घशात घातली जाते, अशा विविध समस्या आहेत. यातून शेतकऱ्यांचा लाभ कमी तर अधिकाऱ्यांचा लाभ अधिक होतो. लाखो शेतकरी भोळेभाळे व अशिक्षित किंवा असतात. याचा लाभ सर्वच अधिकारी, कर्मचारी आणि नेतेमंडळी घेत आहेत.
तालुक्यात एका गावात कोरडवाहू शेती अभियान राबवल्याने भागणार नाही तर चार ते पाच गावात अभियान राबवायला हवे, असे प्रगत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आजही शेतकऱ्यांना शेती करण्यायोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. जमिनीचे व त्यातील सुविधेचे प्रमाण पाहिल्यास शेतकऱ्यांना राबविण्यात येणाऱ्या अभियानाची गती वाढविण्याची गरज आहे. याकरिता तालुक्यात एका गावात नाही तर २० ते २५ गावात हे अभियान राबविल्यावरच शेतकऱ्यांच्या विकासात गती येण्याची शक्यता आहे. अन्यथा या योजना आणि अभियान फोल ठरणार, हे नाकारता येणार नाही.
या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे, खत, औषधी, यंत्र, पॅक हाऊस, ताडपत्री यासह अनेक साहित्य स्वस्त दरात उपलब्ध केल्या जातात. मात्र वेळेवर शेतकऱ्यांजवळ पैसे नसल्याने किंवा मोफत मिळायला हवे या उद्देशाने घेतल्या जात नाहीत.