शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या निकालानंतरही शासन निर्णयास टाळाटाळ

By admin | Updated: August 3, 2014 00:10 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठाने दिलेल्या सात आणि व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उच्च न्यायालयाच्या विविध खंडपिठांनी दिलेल्या

सालेकसा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठाने दिलेल्या सात आणि व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उच्च न्यायालयाच्या विविध खंडपिठांनी दिलेल्या नऊ निर्णयांची अंमलबजावणी करणारे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले नाही. याचे अत्यंत समर्पक पुरावे देऊन राष्ट्रपतीनी ३५६ कलमान्वये शासनच बरखास्त करावे, अशी मागणी एमफुक्टोच्या वतीने राष्ट्रपती, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे केली आहे.उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अंमलबजावणीचा कालावधी निघून गेला तरी शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. यामध्ये विधी मंडळात शासनाने दिलेली आश्वासने, शासन व एमफुक्टो याच्यामध्ये वेळोवेळी झालेले मतैक्य पत्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले निर्देश, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय याचा समावेश आहे. शासनाने शिक्षकांप्रती असलेल्या कमालीच्या व्देषभावनेतून केवळ समन्वयाच्या तत्वांनाच हरताळ फासला नसून घटनेतील १२९ आणि २१५ या कलमाचा देखील भंग केला आहे. नेट-सेटमुक्त प्राध्यापकांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या १८ नोव्हेंबर २०१३ रोजीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास राज्य शासन तयार नाही. यासाठी गोंदिया जिल्हा नुटाने पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने ४ आॅगस्ट २०१४ ला दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे कार्यक्रम आयोजित केला आहे. शिक्षकांच्या अनेक मागण्या अनेक वर्षापासून शासनाकडे पडून आहेत. त्यावर कोणतेही निर्णय न घेतलयामुळे परिक्षेवरील असहकार आंदोलन करण्यास शिक्षकांना बाध्य केले. हे संघटनेचे म्हणणे उच्च न्यायालयाने १० मे २०१३ रोजी दिलेल्या निर्णयात मान्य केले आहे. एक व्यथा निवारण समितीची स्थापना करण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली होती. पण तिची अंमलबजावणी करण्यात आली नाही. प्राध्यापकांप्रती व्देषभावना बाळगून घटनाविरोधी कृती करणारे आणि सतत न्यायालयाच्या अवमान करणाऱ्या सरकारला लवकरात लवकर बरखास्त करावे, अशी मागणी नुटाच्या गोंदिया जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दिलीप जेना, डॉ. नामदेव हटवार, डॉ.बी.बी.परशुरामकर, डॉ.ए.एम.गहाने, प्रा. विजय राणे, डॉ.चांडक, डॉ.नंदेश्वर, प्रा. भूषण फुंडे यांनी केली. दिल्ली येथील धरणे आंदोलनात सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)