शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

४३३ गावात नांदू लागली शांतता

By admin | Updated: December 28, 2015 02:04 IST

गाव शांततेतून समृद्धीकडे जावे यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली.

नरेश रहिले गोंदियागाव शांततेतून समृद्धीकडे जावे यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील तंटे मोठ्या प्रमाणात कमी झाले. गोंदिया जिल्ह्यातील तंटामुक्त गावांचे सर्वेक्षण केल्यावर ५६६ पैकी ४३३ गावे आजही शांततेच्या मार्गावर असून त्या गावातील एकही तंटे पोलीस ठाण्यापर्यंत आले नाही. १२३ गावात तंटे झाल्याचे लक्षात आले.राज्य शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या मोहिमेला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भरभरुन प्रतिसाद मिळाल्यामुळे १५ लाखावरील तंटे समोपचाराने मिटविण्यात आले. या मोहिमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. या मालिकेत गोंदिया जिल्हा राज्यातील पहिला तंटामुक्त होणारा जिल्हा म्हणून नावारुपास आला. राज्यातील १८ हजारापेक्षा अधिक गावे तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरली. परंतु तंटामुक्त पुरस्काराचे मानकरी ठरलेली गावे खरच तंटामुक्त आहेत का? या गावात तंटे झाले का? याचे सर्वेक्षण राज्यभरात पोलीस विभागातर्फे करण्यात आले. तंटामुक्त सेलला मागितलेल्या सर्वेक्षणात अजूनही जिल्ह्यातील तंटामुक्त गावात तंटे उद्भवत असल्याची माहिती पुढे आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील ५५६ गावांपैकी ४३३ गावात एकही तंटा झाला नाही. तर १२३ गावात तंटे झाले असल्याचा अहवाल गोंदिया पोलीस विभागाने राज्य शासनाच्या गृहमंत्रालयाला पाठविला आहे. ३ जानेवारी २०१४ च्या पत्रान्वये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १२ गावात, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ११ गावात, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सात गावात, गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सहा गावात, अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १९ गावात, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाच गावात, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चार गावात, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सहा गावात, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दोन गावात, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सहा गावात, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १२ गावात तर तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या २४ गावात तंटे झाले आहेत. तंटामुक्त पुरस्काराचे मानकरी असलेली ४३३ गावातील तंटामुक्त समितीच्या सदस्यांनी व नागरिकांनी पुरस्काराचे पावित्र्य राखून आपल्या गावातील तंटे पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ दिले नाही. गोंदिया जिल्हा आता व्यसनमुक्त जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.