शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
3
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
4
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
5
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
8
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
9
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
10
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
11
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
12
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
13
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
14
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
15
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
16
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
17
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
18
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
19
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
20
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
Daily Top 2Weekly Top 5

२६ गावातील कोल्हापुरी बंधारे भग्नावस्थेत

By admin | Updated: November 30, 2014 23:07 IST

सडक/अर्जुनी तालुक्यात २६ गावातील नाल्यावर बहुतेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. मात्र त्यांच्या देखरेखी अभावी हे बंधारे आजघडीला भग्नावस्थेत आहेत.

राजेश मुनिश्वर - सडक/अर्जुनी
सडक/अर्जुनी तालुक्यात २६ गावातील नाल्यावर बहुतेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. मात्र त्यांच्या देखरेखी अभावी हे बंधारे आजघडीला भग्नावस्थेत आहेत.
सडक/ अर्जुनी तालुक्यातील राका, सडक/अर्जुनी, दल्ली, बाम्हणी/खडकी, मनेरी, कनेरी, कोसमतोंडी, पांढरी, रेंगेपार, सिंदीपार, गोंगले, हेटी, गिरोला, पांढरवाणी, केसलवाडा, शेंडा, वडेगाव, जांभळी, दोडके, डव्वा, बिंद्राबन, खजरी, घोटी, मुरपार, माऊली, बोपाबोडी या गावात बंधाऱ्याची सोय शासनाने करून दिली. पण शासनाची योजना चालविणारे अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्यामुळे बहुतेक बंधारे आजघडीला पांढरे हत्ती बनले आहेत. लाखो रुपये खर्च करून कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. या योजनेत व अधिकारी मालामाल झाले. पण शेतकऱ्यांचे शेतीचा सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. शेतीच्या सिंचनाबरोबर पाळीव व जंगली प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली असती. पण त्या बंधाऱ्याजवळ १ फुट पाणी राहत नसल्याचे चित्र आजही पहावयास मिळत आहे. वडेगाव/सडक गावाजवळील काळा गोटा १ व काळा गोटा २ या ठिकाणी गेल्या १० वर्षापूर्वी दोन मोठे-मोठे बंधारे बंधाऱ्यात आले. ज्या दिवसापासून या बंधाऱ्याच्या पाट्या काढल्या. त्यानंतर त्या पूर्ण पाट्या चोरीला गेल्या. तेव्हापासून पुन्हा पाट्या लावण्यात आल्या नाही. या दोन्ही बंधाऱ्यामुळे केसलवाडा, पांढरवाणी, वडेगाव, रेंगेपार, डोयेटोला या गावातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली असती पण अधिकाऱ्यांचे नियोजनाचे अभाव व नेत्यांचे दुर्लक्ष यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अपयशी ठरली. योजनेत भ्रष्ट्राचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. कारवाई झाल्यास भ्रष्टाचाराचे प्रमाणही कमी होईल व ती योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे हिताची होईल.
राका येथील कोल्हापुरी बंधारा तालुक्यातील प्रथम क्रमाकांचा बंधारा म्हणून ओळखला जात होता. गेल्या काही वर्षापासून या बंधाऱ्यात पाट्या लावून दार बंद केल्या जात होते. त्यात १० ते २० फुट पाणी दरवर्षी साठवण राहात होते. गेल्या पावसाळ्यात चोरांनी पाट्या चोरल्यामुळे पाट्या लावल्या गेल्या नाहीत. या ठिकाणी नवीन पाट्या लावून पाणी अडवायला पाहिजे होते. पण पाट्या लावण्यास कोणताही अधिकारी धजावला नाही. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात नदीला पाणी अडवीले पाहिजे. पाट्या नसल्यामुळे यंदा राका बंधारा कोरडाच राहण्याचे चित्र दिसत आहे.
राका येथील बंधााऱ्यामुळे सौंदड, राका, चिखली, पिपरी गावातील विहिरींना पाण्याचा स्तर वाढला होता. सध्या स्थितीत राका परिसरातील विहिरींचा जलस्तर खालवण्याची माहिती राजाराम ब्राह्मणकर या शेतकऱ्यांनी दिली. येणाऱ्या काळात पाण्याचा साठा वाढवायचा असेल तर तालुक्यातील सर्वच बंधाऱ्याची डागडूजी करून ते बंधारे विकासाचे प्रवाहात आणण्याची गरज आहे. कोल्हापुरी बंधाऱ्याची योजना शेतकऱ्यांसाठी फारच तारक आहे. या योजनेमुळे तालुक्यातील शेतकरी सुजलाम, सुफलाम होईल. खरीप व रबी पिके घेऊ शकतो, पण सिंचनाची सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा खालावत आहे.