शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

२२९ गावे ‘निर्मल गाव’ योजनेपासून दूर

By admin | Updated: October 18, 2014 01:38 IST

गावातीलच नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी गावातील घाण, केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंमलात आणले.

नरेश रहिले गोंदियागावातीलच नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी गावातील घाण, केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंमलात आणले. गावखेड्यात गावातील रस्त्यावर मानवी विष्ठेची दुर्गंधी नेहमीच पहायला दिसत असल्यामुळे शासनाने निर्मल ग्रामची संकल्पना अंमलात आणली. या निर्मल ग्राम मोहीमेत सहा वर्षात जिल्ह्यातील ३३७ गावे निर्मल ग्राम झाली आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेत अवघ्या चार वर्षात जिल्हा तंटामुक्त झाला. मात्र निर्मल ग्राम योजनेला आठ वर्षाचा काळ झाला असताना अद्याप २२९ गावे अजूनही निर्मल ग्राम योजनेपासून अलिप्त आहेत. गोंदिया तालुक्यात एकूण १०८ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ३ गावे, सन २००६-०७ या वर्षात २४ गावे, सन २००७-०८ या वर्षात ५ गावे, सन २००८-०९ या वर्षात ४ गावे, सन २००९-१० या वर्षात ५ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही. आमगाव तालुक्यात एकूण ६४ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ६ गावे, सन २००६-०७ या वर्षात २२ गावे, सन २००७-०८ या वर्षात १० गावे, सन २००८-०९ या वर्षात ४ गावे, सन २००९-१० या वर्षात ८ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही. तिरोडा तालुक्यात एकूण ९५ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ६ गावे, सन २००६-०७ या वर्षात २६ गावे, सन २००७-०८ या वर्षात १५ गावे, सन २००८-०९ या वर्षात ४ गावे, सन २००९-१० या वर्षात ४ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही. सालेकसा तालुक्यात एकूण ४३ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात एकही गाव नाही, सन २००६-०७ या वर्षात १३ गावे, सन २००७-०८ या वर्षात ९ गावे, सन २००८-०९ या वर्षात निरंक, सन २००९-१० या वर्षात १ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही. देवरी तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ६ गावे, सन २००६-०७ या वर्षात १७ गावे, सन २००७-०८ या वर्षात १२ गावे, सन २००८-०९ या वर्षात ३ गावे, सन २००९-१० या वर्षात ३ गावे, सन २०१०-११ या वर्षात २ गाव निर्मल झाली. सडक/अर्जुनी तालुक्यात एकूण ६३ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ३ गावे, सन २००६-०७ या वर्षात २६ गावे, सन २००७-०८ या वर्षात १२ गावे, सन २००८-०९ , सन २००९-१०, सन २०१०-११ या तीन वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही.अर्जुनी/मोरगाव तालुक्यात एकूण ७१ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ३ गावे, सन २००६-०७ या वर्षात २१ गावे, सन २००७-०८ या वर्षात ९ गावे, सन २००८-०९ या वर्षात २ गावे, सन २००९-१० या वर्षात ५ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही. गोरेगाव तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ४ गावे, सन २००६-०७ या वर्षात २२ गावे, सन २००७-०८ या वर्षात ८ गावे, सन २००८-०९, सन २००९-१० व सन २०१०-११ या तीन्ही वर्षात एकही गाव निर्मल नाही. जिल्ह्यातील ५५६ पैकी पहिल्या वर्षी ३१ गावे, दुसऱ्या वर्षी १७१, गावे तिसऱ्या वर्षी ८० गावे, चौथ्या वर्षी १७ गावे, पाचव्या वर्षी २६ गावे तर सहाव्या वर्षी २ गावे निर्मल ग्राम ठरली. जिल्ह्यातील २२९ गावे निर्मल ग्राम पुरस्कारापासून अलिप्त आहे. सन २०११-१२ या वर्षात निर्मल ग्राम स्पर्धेत असलेल्या गावांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे पाठविला. राज्य शासनाने निरीक्षणही केले. मात्र केंद्र शासनाने या प्रस्तावावर विचारच केला नाही. त्यामुळे सन २०११-१२ या वर्षातील पुरस्कारच घोषित केलेले नाहीत.