शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनास मुकणार

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

यावर्षी असलेले पावसाचे कमी प्रमाण आणि खरीप हंगामात पिकांसाठी सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे रबी (उन्हाळी) हंगामातील पाण्याचे नियोजन पार कोलमडून गेले आहे.

उन्हाळी हंगाम कुचकामी : इटियाडोह प्रकल्पात ठणठणाटमनोज ताजने गोंदियायावर्षी असलेले पावसाचे कमी प्रमाण आणि खरीप हंगामात पिकांसाठी सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे रबी (उन्हाळी) हंगामातील पाण्याचे नियोजन पार कोलमडून गेले आहे. इटियाडोह प्रकल्पात अवघा ६३.२१ दलघमी (१९.८२ टक्के) जलसाठा असल्यामुळे या प्रकल्पातून यावर्षी एक हेक्टर क्षेत्रालाही पाणी देण्याचे नियोजन बाघ-इटियाडोह विभागाने केलेले नाही. गेल्या अनेक वर्षात प्रथमच अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे उन्हाळी धानासह इतर पिकांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे.जिल्ह्यात उन्हाळी हंगामात सर्वाधिक सिंचन इडियाडोह प्रकल्पावरच होते. गेल्यावर्षी या प्रकल्पाच्या पाण्यातून तब्बल ९९०० हेक्टर क्षेत्राला सिंचन झाले होते. पण यावर्षी इटियाडोह प्रकल्पातून पाणी वाटपाचे नियोजनच नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पिकापासून वंचित राहावे लागणार आहे. या प्रकल्पाचे पाणी घेणाऱ्या ५५ पाणी वाटप संस्थांनीही जलसाठ्याची स्थिती पाहता पाणी घेण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे प्रकल्प कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे यावर्षी जवळपास १० हजार हेक्टर क्षेत्राला उन्हाळी हंगामात सिंचनापासून वंचित राहावे लागणार आहे.नियोजन कोणामुळे बिघडले?यावर्षी मोठ्या प्रकल्पांपैकी इटियाडोह प्रकल्पात असलेला ६३.२१ दशलक्ष घटनमीटर जलसाठ्यापैकी ३.०७२ दलघमी पाणी पिण्यासाठी म्हणून राखीव ठेवावे लागते. काही जलसाठा बाष्पीभवन होऊन कमी होतो. उर्वरित जलसाठ्यातून काही प्रमाणात सिंचन होऊ शकते. पण त्यासाठी पुढाकार घेण्यास पाणी वापर संस्था इच्छुक नाही, की इटियाडोह प्रकल्पाचे व्यवस्थापन, याबाबत काही लोक ‘आॅफ द रेकॉर्ड’ वेगवेगळी चर्चा करीत आहेत. कालव्यांच्या दुरूस्तीची कामे करता यावीत यासाठी खरीप हंगामात जास्तीचे पाणी सोडून रबी हंगामात शेतीला पाण्यापासून वंचित ठेवल्या जात आल्याचा आरोप काही शेतकरी करीत आहेत. त्यामुळे हे नियोजन बिघडले की मुद्दाम बिघडविले, हे चर्चेचा विषय झाला आहे.पुराम यांच्यासाठी थांबले आमगाव-सालेकसाचे नियोजनबाघ प्रकल्पाच्या पाण्याचे गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यात वाटप करण्याच्या नियोजनासाठी गुरूवारी बाघ-इटियाडोह प्रकल्पाच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. संबंधित तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार हे बाघ कालवे सल्लागार समितीचे अध्यक्ष असल्यामुळे गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल हे बैठकीला हजर होते. त्यांनी गोंदिया तालुक्यातील पाणी वाटपाचे नियोजन करवून घेतले. मात्र आमदार संजय पुराम हे हजर नसल्यामुळे आमगाव-सालेकसा तालुक्यात कोणत्या संस्थेला किती पाणी द्यायचे याचे नियोजन होऊ शकले नाही.बाघ प्रकल्पातून ११८० हेक्टरचे नियोजनजिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी कालीसरार प्रकल्पात जलसाठा निरंक आहे. त्यामुळे आता केवळ शिरपूर आणि पुजारीटोला धरणावरच रबी हंगामाचे नियोजन अवलंबून आहे. त्यापैकी बाघ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शिरपूरमध्ये ७१.८२ दलघमी तर पुजारीटोलात २५.६२ दलघमी जलसाठा आहे.बाघ प्रकल्पातून करावयाच्या ११८० हेक्टर सिंचनापैकी गोंदिया तालुक्यातील ५९० हेक्टर, आमगाव तालुक्यातील ३५४ हेक्टर तर सालेकसा तालुक्यातील २३६ हेक्टर क्षेत्राला हे पाणी मिळणार आहे.गेल्यावर्षी बाघ आणि इडियाडोह या दोन्ही प्रकल्पांमधून जवळपास १२ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन झाले होते. मात्र १२०० हे. होईल.