शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

"विश्वजित राणेंनी सरकारमधून बाहेर पडून आपण खरा मराठा हे सिद्ध करावे"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 3:47 PM

Vishwajit Rane News : सत्तरीच्या लोकभावनेची कदर कदर करीत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आयआयटी फक्त शेळ मेळावलीतच नव्हे तर सत्तरीत कुठेही नको अशी जी भूमिका घेतली आहे तिचे स्वागत करताना त्यांनी आपले शब्द खरे करून दाखवावेत

मडगाव - सत्तरीच्या लोकभावनेची कदर कदर करीत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आयआयटी फक्त शेळ मेळावलीतच नव्हे तर सत्तरीत कुठेही नको अशी जी भूमिका घेतली आहे तिचे स्वागत करताना त्यांनी आपले शब्द खरे करून दाखवावेत अन्यथा या सरकारातून बाहेर पडून आपण खरे मराठा हे सिद्ध करावे असे आव्हान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केले आहे.

फातोर्डा येथे विकासकामांची सुरवात करताना सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सध्याचे भाजप सरकार आपल्या लोकविरोधी निर्णयामुळे लोकांमध्ये बदनाम होत चालले आहे. अशा सरकारात राणे सारख्या धडाडीच्या नेत्यांना भवितव्य उरलेले नाही. या पक्षात राहणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे. राणे हे फॉरवर्ड जाणारे नेते आहेत त्यामुळे सरकारातून बाहेर पडल्यास त्यांचे कुठलेही राजकीय नुकसान होणार नाही असे सूचक उद्गार सरदेसाई यांनी काढले.

सोमवारी धर्मापूर नावेली येथे झालेल्या एका कार्यक्रमात  भाजप सरकारातील मंत्री मायकल लोबो आणि फिलिप नेरी रोड्रिक्स यांनी रेल्वे दुपदरीकरणा संदर्भात लोकांना जे काय हवे तेच होणार असे जे वक्त्यव्य केले आहे त्याचीही दखल घेताना सरदेसाई यांनी, आता मायकल आणि फिलीपलाही हे सरकार लोकविरोधी हे कळून चुकले आहे. हे सावंतवाडीचे सरकार गोवेकरांना न्याय देऊ शकणार नाही याची त्यांनी जाणीव ठेवावी असे सांगून, फक्त वक्तव्ये करून चालणार नाहीत राणे यांच्या सारखे पत्र लिहून लोकांना रेल्वे दुपदरीकरण आणि कोळशाची वाहतूक नको हे सांगा असा सल्ला दिला.

मडगावच्या सोनसोडो कचरा प्रकल्पाबाबत आता पालिका निवडणुकीनंतर निर्णय घेण्यात येईल असे घन कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी म्हटले आहे. त्याचा समाचार घेताना सरदेसाई म्हणाले, सरकारला सोनसोडो पालिका निवडणुकीचा मुद्दा करायचा आहे का? घन कचरा व्यवस्थापन महामंडळाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच या जागेत बायो मिथेनेशन प्रकल्प बसविण्यासाचा निर्णय मडगाव पालिकेने घेतला. या महामंडळाला सर्व ते सहकार्य दिले. एवढेच नव्हे तर स्वतःचा निधीही महामंडळाला देण्याची तयारी दाखविली. या महामंडळाचे मुख्यमंत्री स्वतः अध्यक्ष आहेत. लोबो उपाध्यक्ष आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या महामंडळाने  पाठविलेली फाईल नगरविकास मंत्री मिलिंद नाईक पास करत नाहीत. त्यांना जे सुटले पाहिजे ते सुटत नाही म्हणून ते भलतेच तंत्रज्ञान आणू पाहतात. महामंडळाच्या तज्ज्ञांनी ज्या तंत्रज्ञानाला मान्यता दिली आहे त्याची तांत्रिक मंजुरी अर्धशिक्षित असेलेले मंत्री नाईक कशी अडवून धरू शकतात असा सवाल केला.

मडगावच्या लोहिया मैदान सुशोभितीकरणाच्या कामाचेही आदेश त्या कंत्राटदाराकडून काही न सुटल्यामुळेच आतापर्यंत दिले गेलेले नाहीत. यावर आपण येत्या अधिवेशनात प्रश्नही घातला आहे. त्यामुळे हा प्रश्न चर्चेला येण्यापूर्वी या कामाचा आदेश त्या कंत्राटदाराला मिळेल याची आपल्याला खात्री आहे असे सांगत सोनसोडो प्रश्नही अधिवेशनात आणावा अशी सरकारची इच्छा आहे का असा सवाल त्यांनी केला.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण