शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांना दिल्लीचे साकडे!

By admin | Updated: November 5, 2014 02:20 IST

मुख्यमंत्री आज दिल्लीत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उमटवली मोहोर!

नवी दिल्ली/पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीत बोलविण्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. पर्रीकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून बुधवारी नवी दिल्लीला निघत आहेत. याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण बुधवारी दुपारी नवी दिल्लीला रवाना होणार हे खरे आहे, असे सांगितले. केंद्रात मोठी जबाबदारी देण्यासंबंधी चर्चेसाठी ही बैठक आहे का, असे विचारले असता त्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसल्याचे ते म्हणाले; परंतु आपली मात्र काही महत्त्वाची कामे तिथे असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळात पर्रीकर यांचे ज्ञान आणि अनुभव उपयोगात आणण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. सध्या बऱ्याच मंत्र्यांकडे दोन किंवा तीन खाती आहेत. पर्रीकर यांनी ३० आॅक्टोबर रोजी मोदींची भेट घेतली, त्या वेळी त्यांच्या सहभागाचे संकेत मिळाले. अरुण जेटली सध्या अर्थमंत्रालयाच्या जबाबदारीत व्यग्र आहेत. त्यांच्याकडील संरक्षण खाते पर्रीकर यांना दिले जाईल. पर्रीकर हे दिल्लीहूनच गोव्याच्या कारभाराकडे लक्ष ठेवणार असून नव्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करतील. पर्रीकर यांनी या प्रस्तावावर विचार करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला. मोदी १२ नोव्हेंबर रोजी म्यान्मार, आॅस्ट्रेलिया आणि फिजीच्या अधिकृत भेटीवर जात आहेत, तत्पूर्वीच हा अंक पार पडेल. नागपूरहून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट करून त्यात राज्यांमधील काही महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश करावा, यासाठी संघाने एक राजकीय नीती तयार केली आहे. या योजनेनुसार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह राजस्थानच्या मुख्यमंत्री विजयाराजे शिंदे यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी देणे घाटत आहे. दिल्लीतील एकूणच मंत्रिमंडळाची फेररचना लवकरच केली जाणार असून संरक्षण मंत्रालयांसह बरेच मोठे बदल त्यात अभिप्रेत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आजपर्यंत दिल्लीचे आपल्याला आमंत्रण आल्याचा इन्कार केला असला, तरी संरक्षण मंत्रालयाची स्वतंत्र जबाबदारी मिळत असेल तर त्यांनी ती स्वीकारावी, असा मतप्रवाह गोव्यातही निर्माण झाला आहे. संरक्षणमंत्रिपद हे सर्वोच्च पद तर आहेच, शिवाय पंतप्रधानांसह अन्य तिघांच्या बनलेल्या सर्वोच्च मंत्रिमंडळाचेही ते सदस्य राहाणार आहेत. हे मंडळ सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार बाळगते. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे, पर्रीकर दिल्लीला जाण्यास तयार असतील तर त्यांना त्यांच्या राज्यात नवीन मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार देण्यासही भाजपा तयार झाला आहे. (विशेष प्रतिनिधी)