शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

गोव्यात लवकरच सेंद्रिय कृषी विद्यापीठाची स्थापना- बाबू कवळेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 7:28 PM

गोवा सेंद्रिय शेतीचे हब बनविण्याचा संकल्प सोडलेल्या गोवा सरकारकडून राज्यात सेंद्रीय कृषी विद्यापीठ सुरू करण्याचे ठरविले आहे.

मडगाव: गोवा सेंद्रिय शेतीचे हब बनविण्याचा संकल्प सोडलेल्या गोवा सरकारकडून राज्यात सेंद्रीय कृषी विद्यापीठ सुरू करण्याचे ठरविले आहे. सोमवारपासून सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यावेळी मुख्यमंत्र्यांकडून या संबंधी घोषणा होणार आहे. कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ते म्हणाले, गोव्यात सेंद्रिय शेतीला उत्तेजन देण्याचा सरकारचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे विद्यापीठ गोव्यात सुरू करण्याचे ठरविले आहे. या विद्यापीठात सेंद्रिय शेतीच्या अभ्यासाबरोबरच नवीन संशोधनाला चालना देण्यात येणार आहे. याशिवाय गोव्यातील सेंद्रिय उत्पादनाचे या विद्यापीठाकडून प्रमाणपत्रे दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.नुवे व वेर्णा या भागातील शेतक-यांनी घेतलेल्या कलिंगडाच्या पिकाला कीड लागल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी कवळेकर शुक्रवारी या भागात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नवीन विद्यापीठाचे सूतोवाच केले. यासाठी केंद्र सरकारकडूनही भरीव मदत  दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.ज्या भागात किडीचा प्रादुर्भाव होऊन कलिंगडांच्या पिकांची नासाडी झाली, त्याचा संपूर्ण आढावा घेण्याचे आदेश आपण कृषी संचालकांना दिले आहेत. गोव्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडत आहे. शेतक-यांकडून औषध फवारणी होऊनही पिकाला कीड लागली. त्यामुळे ही कीड कशी लागली यासंबंधीही संशोधन केले जाणार असल्याचे ते म्हणाले. या शेतक-यांना योग्य ती नुकसानभरपाई दिली जाईल, असेही कवळेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याबरोबर नुवेचे आमदार विल्फ्रेड (बाबाशान) डिसा हे उपस्थित होते.