शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

म्हादई पाणी प्रश्न : कर्नाटकच्या दादागिरीसमोर गोवा सरकार हतबल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 20:03 IST

कर्नाटकच्या यंत्रणोने म्हादई नदीच्या कळसा-भंडुरा या प्रवाहावर कणकुंबी येथे बांध बांधून गोव्याला येणारे पाणी प्रत्यक्ष कर्नाटकच्या दिशेने वळवले आहे.

पणजी : कर्नाटकच्या यंत्रणोने म्हादई नदीच्या कळसा-भंडुरा या प्रवाहावर कणकुंबी येथे बांध बांधून गोव्याला येणारे पाणी प्रत्यक्ष कर्नाटकच्या दिशेने वळवले आहे. कर्नाटकच्या दादागिरीसमोर गोवा सरकार हतबल झाल्यासारखी स्थिती आहे. वरातीमागून घोडे या पद्धतीने आता गोवा सरकारच्या यंत्रणोची धावपळ चालली आहे. राज्य प्रशासन म्हादईप्रश्नी कर्नाटकला रोखण्यात अपयशी ठरल्याबाबत अतिरिक्त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही शनिवारी तीव्र संताप व्यक्त केला. कर्नाटकविरुद्ध लवादासमोर आणि सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका सादर करावी लागेल, असे नाडकर्णी यांनी जाहीर केले.

जलसंसाधन खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी अभियंत्यांसोबत शनिवारी सकाळी कळसा-भंडुरा येथे भेट दिली व तिथे नदीच्या प्रवाहावर प्रत्यक्ष करण्यात आलेल्या बांधकामाची पाहणी केली. मोठा पोलिस फौजफाटाही गोव्यातून नेण्यात आला होता. बांध बांधून प्रत्यक्ष पाणी कर्नाटकच्या दिशेने वळविले गेले असल्याचे आम्ही पाहिले. गोव्यावर याचा मोठा परिणाम संभवतो, असे मंत्री पालयेकर यांनी कणकुंबीला जाऊन आल्यानंतर पत्रकारांना सांगितले. सुर्ल येथील धबधब्यावरही नजिकच्या काळात परिणाम होईल. कर्नाटकने अगदी खालच्या स्तरावर येऊन हिन पद्धतीचे राजकारण केले. न्यायालयाचाही कर्नाटकने अवमान केला आहे, असे मंत्री पालयेकर म्हणाले. आम्ही ही गोष्ट लवादाच्या नजरेस आणून देणार आहोत. कर्नाटकने एवढा मोठा बांध कळसा-भंडुरा प्रवाहावर कधी बांधला तेच कळाले नाही, असे पालयेकर म्हणाले. गोव्याच्या अस्तित्वालाच कर्नाटकने आव्हान दिले आहे. आम्ही म्हादईचा लढा प्राणपणाने लढू, असे पालयेकर म्हणाले.

''पत्रचा गैरवापर नको''

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येडीयुरप्पा यांना जे पत्र दिले ते, पत्र म्हणजे न्यायालयाचा आदेश नव्हे. लवादाचा आदेश यापुढे लवकरच होणार आहे. आम्ही कायद्याची लढाई जिंकायला पोहचलो असतानाच कर्नाटकने घाणोरडे कृत्य केले आहे. कर्नाटकने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पत्रमुळे गैरसमज करून घेऊ नये. त्या पत्रचा गैरवापरही करू नये. कर्नाटक हे कधीच न्यायालयालाही जुमानत नसल्याने त्या राज्यावर कधीच विश्वास ठेवता येत नाही, असे आपण यापूर्वीही म्हटले होते व त्याचा प्रत्यय आता आला, असे पालयेकर म्हणाले. 

नाडकर्णीकडून टीका 

म्हादईप्रश्नी कर्नाटकच्या डावाविरुद्ध गोव्याचे प्रशासन पूर्णपणे गाफील आणि अज्ञानी राहिल्याबाबत संताप वाटतो, असे आत्माराम नाडकर्णी यांनी लोकमतला सांगितले. गोव्यातील आयएएस अधिकारी, जलसंसाधन खात्याचे अधिकारी वगैरे सक्रिय होण्याची गरज आहे. मुख्य सचिवांनीही सक्रिय व्हावे. म्हादईप्रश्नी जे काय घडले आहे ते खूप गंभीर आहे. गोव्याच्या प्रशासनाने गंभीर होण्याची गरज आहे, प्रशासनावर सरकारने स्वत:चा वचक दाखविण्याची वेळ आली आहे, असे नाडकर्णी म्हणाले. लवादासमोर आणि न्यायालयासमोर अवमान याचिका सादर करावीच लागेल असेही ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर