शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

म्हादई पाणी प्रश्न : कर्नाटकच्या दादागिरीसमोर गोवा सरकार हतबल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 20:03 IST

कर्नाटकच्या यंत्रणोने म्हादई नदीच्या कळसा-भंडुरा या प्रवाहावर कणकुंबी येथे बांध बांधून गोव्याला येणारे पाणी प्रत्यक्ष कर्नाटकच्या दिशेने वळवले आहे.

पणजी : कर्नाटकच्या यंत्रणोने म्हादई नदीच्या कळसा-भंडुरा या प्रवाहावर कणकुंबी येथे बांध बांधून गोव्याला येणारे पाणी प्रत्यक्ष कर्नाटकच्या दिशेने वळवले आहे. कर्नाटकच्या दादागिरीसमोर गोवा सरकार हतबल झाल्यासारखी स्थिती आहे. वरातीमागून घोडे या पद्धतीने आता गोवा सरकारच्या यंत्रणोची धावपळ चालली आहे. राज्य प्रशासन म्हादईप्रश्नी कर्नाटकला रोखण्यात अपयशी ठरल्याबाबत अतिरिक्त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही शनिवारी तीव्र संताप व्यक्त केला. कर्नाटकविरुद्ध लवादासमोर आणि सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका सादर करावी लागेल, असे नाडकर्णी यांनी जाहीर केले.

जलसंसाधन खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी अभियंत्यांसोबत शनिवारी सकाळी कळसा-भंडुरा येथे भेट दिली व तिथे नदीच्या प्रवाहावर प्रत्यक्ष करण्यात आलेल्या बांधकामाची पाहणी केली. मोठा पोलिस फौजफाटाही गोव्यातून नेण्यात आला होता. बांध बांधून प्रत्यक्ष पाणी कर्नाटकच्या दिशेने वळविले गेले असल्याचे आम्ही पाहिले. गोव्यावर याचा मोठा परिणाम संभवतो, असे मंत्री पालयेकर यांनी कणकुंबीला जाऊन आल्यानंतर पत्रकारांना सांगितले. सुर्ल येथील धबधब्यावरही नजिकच्या काळात परिणाम होईल. कर्नाटकने अगदी खालच्या स्तरावर येऊन हिन पद्धतीचे राजकारण केले. न्यायालयाचाही कर्नाटकने अवमान केला आहे, असे मंत्री पालयेकर म्हणाले. आम्ही ही गोष्ट लवादाच्या नजरेस आणून देणार आहोत. कर्नाटकने एवढा मोठा बांध कळसा-भंडुरा प्रवाहावर कधी बांधला तेच कळाले नाही, असे पालयेकर म्हणाले. गोव्याच्या अस्तित्वालाच कर्नाटकने आव्हान दिले आहे. आम्ही म्हादईचा लढा प्राणपणाने लढू, असे पालयेकर म्हणाले.

''पत्रचा गैरवापर नको''

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येडीयुरप्पा यांना जे पत्र दिले ते, पत्र म्हणजे न्यायालयाचा आदेश नव्हे. लवादाचा आदेश यापुढे लवकरच होणार आहे. आम्ही कायद्याची लढाई जिंकायला पोहचलो असतानाच कर्नाटकने घाणोरडे कृत्य केले आहे. कर्नाटकने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पत्रमुळे गैरसमज करून घेऊ नये. त्या पत्रचा गैरवापरही करू नये. कर्नाटक हे कधीच न्यायालयालाही जुमानत नसल्याने त्या राज्यावर कधीच विश्वास ठेवता येत नाही, असे आपण यापूर्वीही म्हटले होते व त्याचा प्रत्यय आता आला, असे पालयेकर म्हणाले. 

नाडकर्णीकडून टीका 

म्हादईप्रश्नी कर्नाटकच्या डावाविरुद्ध गोव्याचे प्रशासन पूर्णपणे गाफील आणि अज्ञानी राहिल्याबाबत संताप वाटतो, असे आत्माराम नाडकर्णी यांनी लोकमतला सांगितले. गोव्यातील आयएएस अधिकारी, जलसंसाधन खात्याचे अधिकारी वगैरे सक्रिय होण्याची गरज आहे. मुख्य सचिवांनीही सक्रिय व्हावे. म्हादईप्रश्नी जे काय घडले आहे ते खूप गंभीर आहे. गोव्याच्या प्रशासनाने गंभीर होण्याची गरज आहे, प्रशासनावर सरकारने स्वत:चा वचक दाखविण्याची वेळ आली आहे, असे नाडकर्णी म्हणाले. लवादासमोर आणि न्यायालयासमोर अवमान याचिका सादर करावीच लागेल असेही ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर