शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमुळे म्हादई नदीतील पाण्याची पातळी खालावली, मुख्यमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 19:38 IST

pramod sawant : कर्नाटक जोपर्यंत पाणी गोव्यात सोडत नाही, तोपर्यंत कर्नाटकशी आम्ही म्हादईप्रश्नी कसलीच बोलणी करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले

ठळक मुद्देम्हादईचा जो प्रवाह कर्नाटकने वळविला तो प्रवाह अगोदर गोव्यात सोडा, मग चर्चेविषयी पाहू अशी गोव्याची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पणजी : म्हादई नदीतील पाण्याची गोव्याच्या बाजूने पातळी कमी झालेली आहे. कर्नाटकने पाणी वळविल्याने असे घडले आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले. कर्नाटक जोपर्यंत पाणी गोव्यात सोडत नाही, तोपर्यंत कर्नाटकशी आम्ही म्हादईप्रश्नी कसलीच बोलणी करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी वळविले व त्यामुळे गोव्यात पाण्याची पातळी कमी झाली हे आपण भाजपचे गोवा प्रभारी असलेले कर्नाटकचे आमदार सी. टी. रवी यांनाही सांगितले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी येथे पत्रकारांना सांगितले. कर्नाटकने अवमान केला आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात  यापूर्वीच अवमान याचिका सादर केली असून त्यावर आम्ही ठाम आहोत.

कर्नाटकशी आम्हाला न्यायालयाच्या कक्षेबाहेर जाऊन कोणतीच चर्चा करायची नाही. आपल्याला कर्नाटकमधील नुकतीच एक व्यक्ती भेटली तेव्हा त्या व्यक्तीसोबतही आपण म्हादईविषयी काहीच चर्चा केली नाही. म्हादईचा जो प्रवाह कर्नाटकने वळविला तो प्रवाह अगोदर गोव्यात सोडा, मग चर्चेविषयी पाहू अशी गोव्याची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दुधसागरवरही परिणाममगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी म्हादईची पाण्याची पातळी गोव्यात घटल्याचे दीड वर्षापूर्वीच सांगून तशी छायाचित्रेही सादर केली होती. कर्नाटकच्या योजनेमुळे यापुढे दुधसागर धबधबाही बंद होईल, असे ढवळीकर यांनी शुक्रवारी सांगितले. पातळी घटली हे सरकार आता दीड वर्षाने मान्य करते असे ढवळीकर म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत