शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात २४ तास मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स खुली ठेवणे शक्य आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 13:09 IST

पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात मुंबईच्या धर्तीवर २४ तास मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स खुली ठेवणे शक्य आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे.

पणजी : पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात मुंबईच्या धर्तीवर २४ तास मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स खुली ठेवणे शक्य आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांचे मत असे आहे की, गोव्यात हा प्रयोग करता येईल. परंतु व्यावसायिकांकडून प्रस्ताव येऊ द्या, या प्रस्तावावर नंतर अभ्यास करून काय तो निर्णय घेता येईल.

गोवा जागतिक नकाशावरील पर्यटन स्थळ म्हणून धडकत आह. येथील किनारी भागात एरवीच नाईट लाईट सुरू असते. देश-विदेशातून जिवाचा गोवा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या नाईट लाईफची भुरळ पडलेली आहे. कळंगुट, बागा हणजुण यासारखे ठिकाणी नाईट लाईफ सुरू झाले आहे, कळंगुट भागातील रेस्टॉरंट, शॅक पहाटेपर्यंत उघडे असतात. तेथे मद्य पुरवठाही केला जातो.

अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ म्हणाले की, महाराष्ट्र सरकारचा चांगला निर्णय आहे. गोवा हे पर्यटन स्थळ आहे. येथे नाईट लाइफचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येत असतात. रात्रीच्या वेळी मॉल्स, मल्टिप्लेक्स उघडे ठेवल्यास पर्यटन व्यवसाय त्याचा फायदा होईल. मात्र त्याचबरोबर पोलिसांच्या गस्ती वाढवायला हव्यात. गोव्याचे नाव बदनाम होणार नाही याची काळजी घ्यावी.दुसरीकडे काहीजणांचे मत असे आहे की, सध्या तरी हे शक्य नाही.अखिल गोवा हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले की रात्रीच्या वेळी मॉल्स, रेस्टॉरंट सुरू ठेवायची झाली तर आधी लोकांची रहदारी असायला हवी. बागा, कळंगुट आदी किनारी भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालतात. राजधानी पणजी शहरात कॅसिनोवर लोक येतात. त्यामुळे काहीशी वर्दळ असते, परंतु जोपर्यंत पुरेशी वर्दळ होत नाही, तोपर्यंत हे शक्य होईल असे वाटत नाही. रात्रीची आस्थापने चालू ठेवण्यासाठी सरकारने धोरण तयार करायला हवे. एखादी गोष्ट आरंभशूरपणे सुरू करणे आणि सहा महिन्यातच बंद करणे, असे होता कामा नये.धोंड यांचे राजधानी शहरात हॉटेल आहे ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे येणारे देशी पर्यटक हे पुन्हा पुन्हा गोव्याला भेट देणारे असतात. गोवा आता महागडे डेस्टिनेशन बनले आहे. भारतीय पर्यटक गुजरात, कर्नाटक, केरळ तसेच शेजारी सिंधुदुर्ग-रत्नागिरीला जातात. कोकणात चांगले किनारे आहेत. तसेच तेथे जलक्रीडाही सुरू झालेल्या आहेत.  त्यामुळे पर्यटक तेथे जातात.पणजीचे महापौर उदय मडकईकर म्हणाले की, पणजी शहराचा विचार केला तर रात्रीच्यावेळी केवळ कॅसिनोंमुळे शहरात वर्दळ असते. स्थानिक लोक फिरकत नाहीत. पूर्वी रात्री ८ वाजताच पणजीत सामसूम होत असे. मल्टिप्लेक्स, मॉल्स किंवा  रेस्टॉरंट तास खुले ठेवण्याचा प्रयोग केला तर तो चालेल असे वाटत नाही. पणजी मार्केट कूळ संघटनेचे सचिव धर्मेंद्र भगत म्हणाले की, आधीच स्थानिक दुकानदारांना मॉलनी जेरीस आणले आहे. रात्रीचे उशिरा मॉल चालू राहिल्यास त्याचा मोठा फटका स्थानिक दुकानदारांना बसेल. मॉलना मुभा दिली तर मग बाजारपेठेत दुकानेही रात्रीची खुली का नको? असा सवाल त्यांनी केला.