शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
3
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
4
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
5
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
6
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
7
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
8
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
9
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
10
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
11
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
12
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
13
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
14
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
15
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
16
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
17
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
18
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
19
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
20
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही तुटणार ४० गावांचा संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2015 01:59 IST

येथून एक किमी अंतरावर असलेल्या गडअहेरी नाल्यावरील ठेंगणा पूल कायम असल्याने ..

अहेरी : येथून एक किमी अंतरावर असलेल्या गडअहेरी नाल्यावरील ठेंगणा पूल कायम असल्याने यावर्षीही या परिसरातील ४० गावांचा संपर्क पावसाळ्यात तुटण्याची शक्यता आहे. याचा फटका हजारो नागरिकांना बसणार आहे.
अहेरी-देवलमरी मार्गावर गडअहेरी नाला आहे. या नाल्यावर पूल आहे. मात्र या पुलाची उंची अत्यंत कमी आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होताच पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. परिणामी पावसाळ्यात अनेक वेळा या मार्गावरील वाहतूक खोळंबते. अनेक नागरिक जीव धोक्यात घालून नाल्यातून किंवा पुलावरून पाणी असताना प्रवास करतात. या परिसरात सुमारे ४० गावे असल्याने या पुलाची उंची वाढवावी, याबाबतची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र अजूनपर्यंत या पुलाच्या बांधकामास प्रशासनाने मंजुरी दिली नाही. मागील वर्षी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी देवलमरी भागाचा दौरा केला होता. त्यावेळी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी या पुलाची समस्या लक्षात आणून दिली होती. लवकरच पुलाच्या बांधकामाला मंजुरी दिले जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही. आ. दीपक आत्राम यांनीही दिलेला शब्द पूर्णत्वास नेला नाही. त्यामुळे आजतागायत ही समस्या कायम आहे. याचा त्रास हजारो नागरिकांना सहन करावा लागत असल्याने पुलाची उंची वाढविण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)