लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : चारचाकी वाहनातून तेलंगणा राज्यात लाकूड तस्करी केली जाणारी लाकडे व वाहने वनविभागाच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतली आहेत. वाहन व लाकडांची किंमत ५ लाख २० हजार रुपये होते.सिरोंचाजवळ प्राणहिता नदीवर पुलाचे बांधकाम झाले आहे. या पुलाचे अजूनपर्यंत उद्घाटन झाले नाही. मात्र वाहतूक सुरू आहे. तेलंगणा व महाराष्ट्रात एकाही ठिकाणी वनविभागाचा नाका नाही. त्यामुळे सिरोंचातून निघालेल्या वाहनाला कुठेच अटकाव नसल्याने तेलंगणा राज्यात लाकडाची तस्करी केली जात होती. वाहनांच्या सहाय्याने लाकूड तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती सिरोंचाचे वनपरिक्षेत्राधिकारी नरखेडकर यांना प्राप्त झाली. त्यानुसार रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास सापळा रचण्यात आला. वनविभागाच्या पथकाला बघून वाहनचालकांनी पळ काढला. सदर कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी वि.वा.नरखेडकर, क्षेत्रसहायक बी.एम.खोब्रागडे, एल.एम.शेख, एस.एस.येनगंटीवार, बी.एम.नरोटे, डी.जी.भुरसे, ए.एम.बगडे यांनी केली. दोन्ही वाहने वनविभागाच्या पथकाने जप्त केली आहेत. तेलंगणाकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी होण्यासाठी पुलानजीक वनविभागाने नाका बनविण्याची गरज आहे.
लाकूड तस्करी करणारी दोन वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 6:00 AM
सिरोंचाजवळ प्राणहिता नदीवर पुलाचे बांधकाम झाले आहे. या पुलाचे अजूनपर्यंत उद्घाटन झाले नाही. मात्र वाहतूक सुरू आहे. तेलंगणा व महाराष्ट्रात एकाही ठिकाणी वनविभागाचा नाका नाही. त्यामुळे सिरोंचातून निघालेल्या वाहनाला कुठेच अटकाव नसल्याने तेलंगणा राज्यात लाकडाची तस्करी केली जात होती.
ठळक मुद्देसिरोंचात कारवाई : नंदीगावजवळची घटना