शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

१३ ग्रामपंचायतीच्या कारभारीणी बनल्या महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:26 AM

ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा आणि राजकारणाचा महत्वाचा पाया समजला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या ५० टक्के आरक्षणामुळे आता महिलांनाही ...

ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा आणि राजकारणाचा महत्वाचा पाया समजला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या ५० टक्के आरक्षणामुळे आता महिलांनाही गावाचा विकास करण्याची संधी माेठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. आरमोरी तालुक्यातील ३२ पैकी २९ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या. निवडणुका झाल्यानंतर सरपंच व उपसरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. त्यानुसार नुकत्याच सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये १३ ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलांनी पटकाविले आहे.

उपसरपंच म्हणून १० ग्रामपंचायतमध्ये महिला विराजमान झाल्या आहेत. यामध्ये वासाळा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी उज्वला गणेश मंगरे, वघाळाच्या उपसरपंचपदी शिल्पा संदीप अनोले, ठाणेगावच्या उपसरपंचपदी स्नेहा गोपाल भांडेकर, कुरंडीमालच्या उपसरपंचपदी सुनंदा बळीराम मडावी, मानापूरच्या उपसरपंचपदी वैशाली रंजीत खुणे, देऊळगावच्या उपसरपंच पदी वंदना राजेंद्र कामतकर, पळसगावच्या उपसरपंच म्हणून सोनी गणेश गरफडे, चुरमुराच्या उपसरपंच म्हणून मोतन विलास कांबळे, सिर्सीच्या उपसरपंचपदी दर्शना सुधाकर बोबाटे, चामोर्शी(माल) भाग्यशीला मुखरू गेडाम आदी दहा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महिलांची निवड झाली आहे.

आरमोरी तालुक्यातील वैरागड, वडधा या माेठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सूत्र महिलांच्या हातात आली आहेत. वासाळा, कुरंडीमाल, देऊळगाव, मानापूर, पळसगाव या पाच ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे महिलांनी पटकावली आहेत. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर येऊन पडली असून ही जबाबदारी महिला समर्थपणे पार पाडतील यात शंका नाही.

बाॅक्स ......

या महिलांकडे आली गावाची सूत्रे

देऊळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शामादेवी कवळू सहारे, इंजेवारीच्या सरपंच पदी अल्का योगाजी कुकुडकर, डोंगरसावंगीच्या सरपंचपदी सुलभा प्रदीप गेडाम, देलनवाडीच्या सरपंच म्हणून शुभांगी हरिदास मेश्राम, कुरंडीमालच्या सरपंच म्हणून शारदा विनायक मडावी, सायगावच्या सरपंचपदी शीतल संदीप धोटे, वडधाच्या सरपंचपदी प्रिया भास्कर गेडाम, मानापूरच्या सरपंच म्हणून कुंता दुर्गादास नारनवरे, डोंगरगाव(भु)च्या सरपंचपदी छाया भास्कर खरकाटे, पळसगावच्या सरपंचपदी जयश्री त्त्र्यंबक दडमल, वैरागडच्या सरपंच संगीता खुशाल पेंदाम, बोरी(चक) च्या सरपंच पदी ज्योती दुर्वेश कोसरे ग्रामपंचायत मध्ये महिलाची सरपंचपदी वर्णी लागली आहे.