शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लोह खनिज कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:36 IST

सुरजागडच्या लोह खाणीतील मौल्यवान दगडांची पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस प्रकल्पात वाहतूक करण्याचे नियोजन कंपनीकडून केले जात आहे. एका ...

सुरजागडच्या लोह खाणीतील मौल्यवान दगडांची पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस प्रकल्पात वाहतूक करण्याचे नियोजन कंपनीकडून केले जात आहे. एका अपघाताच्या निमित्ताने उफाळून आलेला स्थानिक नागरिकांचा विरोध आणि पोलिसांच्या सुरक्षेपोटी थकीत असलेले भाडे यामुळे दोन वर्षांपासून हे काम बंद आहे. मात्र स्थानिक नागरिक आणि नक्षल्यांचा विरोध मोडून काढत पुन्हा एकदा लोह खाण सुरू करण्यासाठी कामगारांची जुळवाजुळव केली जात आहे. वास्तविक दोन महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांनी एका युवकाची हत्या केल्यानंतर अनेकजण लोह खाणीत कामगार म्हणून जाण्यासाठी सहजासहजी तयार होताना दिसत नाही. मात्र मोठी बेरोजगारी असल्यामुळे काही युवक जिवावर उदार होऊन अल्का कन्सल्टन्सीकडे आपले संमतीपत्र लिहून देत आहेत. कामगारांकडून त्यांची आपली माहिती भरून घेताना दिलेल्या अटी व शर्तीमध्ये आपल्याला नक्षलग्रस्त भाग आणि येथील परिस्थितीची जाणीव असून, आपल्या जबाबदाऱ्यांसाठी कंपनीला जबाबदार धरले जाणार नाही, असे नमूद आहे. यासंदर्भात कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या सहीने एक वेगळे हमीपत्रही लिहून घेतले जाणार आहे.

या अटीमुळे कामगारांच्या जीवितास काही झाले तर त्यांचे कुटुंबीय कोणताही मोबदला कंपनीकडे मागू शकणार नाही. विशेष म्हणजे हा सर्व व्यवहार अल्का कन्सल्टन्सीसोबत होत असून, लॉयड्स मेटल्सकडून कोणत्याही कामगाराला स्थायी नोकरी मिळणार नसल्यामुळे अनेक सुशिक्षित युवक तीव्र नाराजी व्यक्त करत कंपनीची ऑफर धुडकावत आहेत.

(बॉक्स)

बाहेरील लोकांनाच प्राधान्य

सुरजागडच्या लोह खाणीची लीज लॉयड्स मेटल्स या कंपनीला मिळाली असली तरी ही कंपनी आता केवळ नावापुरतीच राहिल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात लॉयड्सने हे काम दक्षिण भारतातील त्रिवेणी मायनिंग या कंपनीकडे सोपवले आहे. त्रिवेणी कंपनीने लोह खाणीच्या कामासाठी कामगार जुळवण्याचे काम अल्का कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीकडे सोपविले. वास्तविक लोह खनिज प्रकल्प उभारण्यापासून तर लोहदगड वाहतुकीपर्यंतची कामे स्थानिक लोकांनाच दिली जाईल, असा देखावा कंपनीकडून आधी करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात बाहेरील लोकांनाच प्राधान्य दिले जात असल्यामुळे स्थानिक लोकांना केवळ मोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात त्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.