शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी तालुक्यात अनेकांना धोबीपछाड

By admin | Updated: February 25, 2017 01:25 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक नऊ जागा असलेल्या चामोर्शी तालुक्यात भाजपने सहा जागा जिंकत इतर अनेक पक्षांना मोठी धोबीपछाड दिली आहे.

काँग्रेसने यंदा खाते उघडले : मुख्यमंत्र्यांच्या सभेचा भाजपला झाला फायदा; गण्यारपवारांचा झंझावात दिसलाच रत्नाकर बोमीडवार ल्ल चामोर्शी जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक नऊ जागा असलेल्या चामोर्शी तालुक्यात भाजपने सहा जागा जिंकत इतर अनेक पक्षांना मोठी धोबीपछाड दिली आहे. काँग्रेसनेही या निवडणुकीत दोन जागा जिंकून चामोर्शी तालुक्यात आपले खाते उघडले आहे. तर अपक्ष म्हणून निवणूक लढणारे अतुल गण्यारपवार यांनीही स्वत:ची जागा कायम राखत इतरांना चारही मुंड्या चित केले. गतवेळी चामोर्शी तालुक्यातून भाजपचे पाच, राकाँचे तीन व एक अपक्ष सदस्य निवडून आला होता. काँग्रेसला येथे भोपळा फोडता आला नव्हता. अतुल गण्यारपवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडताच चामोर्शी तालुक्यातून पक्षाला गाशाच गुंडाळावा लागला. भाजपने नऊही क्षेत्रामध्ये चांगली हवा निर्माण केली होती. दस्तखुर्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा चामोर्शी येथे घेण्यात आली. मात्र चामोर्शी तालुक्यात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे व अध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या अंजली ओल्लालवार यांचा पराभव या निवडणुकीत झाला. तो पक्षाला जिव्हारी लागणारा आहे. अतुल गण्यारपवारांनी नऊ पैकी सात जि.प. क्षेत्रात आपले उमेदवार उभे केले होते. ते स्वत: १६०० मतांनी निवडून आले. तर काही ठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी काँग्रेसपेक्षा जास्त मताधिक्य मिळविले आहे. विसापूर-कुरूळ, विक्रमपूर-फराडा, दुर्गापूर-वायगाव या क्षेत्रात गण्यारपवारांचे समर्थक उमेदवार दुसऱ्या स्थानावर आहेत. तर भेंडाळा-मुरखळा क्षेत्रातही भाजपला मागे टाकत गण्यारपवारांचा उमेदवार दुसऱ्या स्थानी आहे. इतर दोन ठिकाणी तिसऱ्या स्थानावर गण्यारपवार समर्थकांना समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसने गण्यारपवारांना बाहेर लोटल्याने राकाँची वाताहात झाली आहे. आता तरी राष्ट्रवादी काँग्रेसने आत्मचिंतन करून यावर विचार करण्याची गरज आहे. काँग्रेसने प्रचंड संघर्षानंतर दोन जागा जिंकल्या असल्या तरी काँग्र्रेसने चामोर्शी तालुक्यात जि.प.ची निवडणूक मनावर घेतली नाही. आमदार विजय वडेट्टीवार वगळता, कोणताही मोठा नेता पक्षाच्या प्रचारासाठी आला नाही. पक्षाच्या उमेदवाराकडे रसदही पोहोचली नाही. काँग्रेसच्या दोन जागांवरचा विजय हा उमेदवारांनी स्वबळावर मिळविलेला विजय आहे. कुनघाडा रै.-तळोधी, हळदवाही-रेगडी हे दोन मतदार संघ वगळता काँग्रेस कुठेही दिसली नाही. या दोन्ही क्षेत्रात काँग्रेसचा झालेला पराभव हा पक्षासाठी आत्मचिंतनाचा विषय आहे. नेतृत्वाचा अभाव, विखुरलेले संघटन व वरिष्ठ नेत्यांचे कायम राहिलेले दुर्लक्ष यामुळे काँग्रेसला दोनपेक्षा पुढे पाऊल टाकता आले नाही. नोटबंदीनंतर ग्रामीण जनतेला शेतकऱ्यांना प्रचंड त्रास झाला. मात्र सरकारवरचा हा राग काँग्रेसला निवडणुकीतून मांडता आला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला मोठा जनाधार याच तालुक्यातून मिळाला.