शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयाच्या खोल्या झाल्या गुदाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:38 IST

जिल्हाभरातील नागरिक ग्रहण करत असलेल्या सार्वजनिक ठिकाणच्या अन्नापासून तर ते घेत असलेल्या औषधींच्या तपासणीपर्यंतची महत्त्वाची जबाबदारी या विभागाला सांभाळावी ...

जिल्हाभरातील नागरिक ग्रहण करत असलेल्या सार्वजनिक ठिकाणच्या अन्नापासून तर ते घेत असलेल्या औषधींच्या तपासणीपर्यंतची महत्त्वाची जबाबदारी या विभागाला सांभाळावी लागते. मात्र अनेक वर्षांपासून या विभागात अधिकाऱ्यांची कमतरता आहे. औषध प्रशासन विभाग तर पूर्णपणे वाऱ्यावरच सोडला आहे. त्यात एकही पूर्णवेळ अधिकारी नाही. अन्न विभागात नागपूर येथील सहायक आयुक्तांकडे येथील प्रभार आहे. एका अन्न निरीक्षकाला जिल्हाभरातील कामकाज सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरीही ते जिल्हाभरात फिरून तपासण्या करत मिळेल तिथे कारवाई करत असतात. मात्र विभागाने त्यांना पुरेशा सोयी आणि मनुष्यबळ दिल्यास त्यांच्या तपासण्यांचा वेग वाढू शकतो.

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ यादरम्यान जप्त सुगंधित तंबाखू

महिना किंमत

एप्रिल १,२४,७८५

जून ७९,२३०

जुलै ५५,४०८

ऑक्टोबर १,६२,९५०

डिसेंबर २,०५,३४५

जानेवारी २७,१८०

फेब्रुवारी ७९,३८०

मार्च १,०३,५४५

(बॉक्स)

वर्षभरात ३८.८३ लाखांचा तंबाखू साठा जप्त

- जिल्ह्यात खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. साध्या तंबाखूसोबत सुगंधित तंबाखू टाकून बनविलेल्या खर्ऱ्याला सर्वाधिक मागणी आहे. सुगंधित तंबाखूचे डबे नागपूर, तेलंगणा, छत्तीसगडमार्गे जिल्ह्यात आणणे सहज शक्य असल्यामुळे त्यांना रोखणे जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष वापर करणाऱ्यांवर कारवाई करणे हाच महत्त्वाचा सोपा मार्ग असतो.

- वर्षभरातील कारवायांवर नजर टाकल्यास अन्न निरीक्षक एस.पी. तोरेम यांनी २३ कारवायांमध्ये ३८ लाख ८३ हजारांचा सुगंधित तंबाखू साठा जप्त केला आहे. यातील काही कारवाया साठेबाजी करणाऱ्यांवर तर काही विक्रेत्यांवरील आहेत. मनुष्यबळ मिळाल्यास सदर कारवाया वाढू शकतात.

(बॉक्स)

जप्त केलेला माल ठेवायचा कुठे?

- जप्त केलेला तंबाखू किंवा अन्य कोणताही माल ठेवण्यासाठी या विभागाकडे जागाच नाही. दीड वर्षापूर्वी परिवहन विभागाचे कार्यालय त्यांच्या नवीन इमारतीत स्थानांतरित झाल्यानंतर त्यांच्या रिकाम्या झालेल्या चार खोल्यांच्या कार्यालयाला अन्न प्रशासन विभागाने जिल्हा प्रशासनाकडून मागून आपले गुदाम बनविले.

- प्रकरण न्यायप्रविष्ठ असेपर्यंत जप्त माल सुरक्षित ठेवावा लागतो. प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तो माल नष्ट केला जातो. विशेष म्हणजे राज्यात प्रयोगशाळाही मर्यादित असल्यामुळे जप्त मालाचा रिपोर्ट येण्यासाठी २ ते ३ महिने लागतात.

जिल्ह्यात खर्ऱ्यासाठी लागणाऱ्या सुगंधित तंबाखूला आळा घालणे हे उद्दिष्ट.