शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रामवन’साठी वनविभागाचा दबाव नाही

By admin | Updated: September 4, 2014 23:47 IST

भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २८ मधील तरतुदीनुसार जी वने संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना संयुक्त वनव्यवस्थापनाकरीता देण्यात आली आहे. अशी वने ‘ग्रामवन’ म्हणून अभिहस्तांकित

गडचिरोली : भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २८ मधील तरतुदीनुसार जी वने संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना संयुक्त वनव्यवस्थापनाकरीता देण्यात आली आहे. अशी वने ‘ग्रामवन’ म्हणून अभिहस्तांकित करण्यास महसूल व वनविभागाला मान्यता मिळाली आहे. या अनुषंगाने वनविभागाने कार्यवाही सुरू केली आहे. मात्र काही अशासकीय संस्था गावकऱ्यांवर ठराव पारित न करण्याबाबत गैरसमज निर्माण करीत आहेत. ग्रामवनासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर होणे आवश्यक आहे. ग्रामवन हे गावकऱ्यांच्या इच्छेवर अवलंबून असून ग्रामवन घोषीत करण्यासाठी वनविभाग गावकऱ्यांवर दबाव टाकू शकत नाही, अशी माहिती गडचिरोली वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अण्णाबत्तुला यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माहिती देताना श्रीलक्ष्मी अण्णाबत्तुला म्हणाल्या, गावांना हक्क मिळवून देण्याकरीता वनविभागाने पुढाकार घेतला असून ग्रामवनासाठी वनकर्मचारी प्रत्येक गावात जाऊन लोकांना माहिती देत आहेत. ग्रामवन नियम लागू करण्याकरीता ग्रामसभेत जोपर्यंत ठराव मंजूर होत नाही तोपर्यंत ग्रामवन घोषीत करता येत नाही. तसेच या अनुषंगाने पुढील १० वर्षाचा सुक्ष्म आराखडा तयार करण्याची प्रक्रियाही करता येत नाही, असेही श्रीलक्ष्मी अण्णाबत्तुला यांनी यावेळी सांगितले. ग्रामसभेत ठराव घेऊनच ‘ग्रामवन’ व्यवस्थापन समिती तयार करण्याची कारवाई वनविभागाला करता येणे शक्य आहे. ग्रामसभेत ठराव मंजूर झाल्यास शासन निर्णयाप्रमाणे शुन्य अतिक्रमण, नैसर्गिक पुनरूत्पादनात वाढ, आगीच्या क्षेत्राचे प्रमाण ५ टक्क्यापेक्षा कमी, वनीकरणातील जीवंत रोपांचे प्रमाण ६० टक्क्यापर्यंत कमी, चराई बंदी, कुऱ्हाड बंदी आदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अटीवरच ग्रामवन घोषीत करता येते, असे शासन निर्णयात नमूद आहे. या अटीपैकी कमीतकमी ३ अटी पूर्ण करीत असलेल्या गावानाच ग्रामवन म्हणून घोषीत केले जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामवन घोषीत करण्यासाठी काही दिवसापूर्वी वनविभागाच्यावतीने वनकर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. ग्रामवनाची संकल्पना राबविणारा गडचिरोली जिल्हा हा देशात पहिला जिल्हा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)