शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

दहावी निकालात सरकार नापास, विद्यार्थी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST

कोरोनामुळे दहावीचे सत्र २३ नोव्हेंबरला सुरू झाले. पुन्हा १५ फेब्रुवारीला वर्ग बंद करण्यात आले. अडीच महिनेच शाळा सुरू राहिली. ...

कोरोनामुळे दहावीचे सत्र २३ नोव्हेंबरला सुरू झाले. पुन्हा १५ फेब्रुवारीला वर्ग बंद करण्यात आले. अडीच महिनेच शाळा सुरू राहिली. त्यातही बस व वसतिगृह सुरू न केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत पोहोचू शकले नाही. अनेक पालकांनी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. आता परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन व नववीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे. ५० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन राहणार आहे. त्यात दोन प्रकार करण्यात आले आहे, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २० गुण राहणार असून गृहपाठ, सराव परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा मिळून ३० गुण राहणार आहेत. गेल्या वर्षी जे विद्यार्थी नववी पास झाले त्या निकालाच्या आधारावर ५० गुण आहेत. त्यातही गोंधळ म्हणजे विद्यार्थी व पालकांना मूल्यमापन पध्दत मान्य नसेल तर लेखी परीक्षा कोरोनानंतर घेण्यात येणार आहे. शंभरपैकी पाच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे. असे म्हटल्यास निकाल राखीव ठेवणार का, निकाल जाहीर केला नाही तर पुढची प्रवेशप्रक्रिया पुढे ढकलणार का? या सत्रात अनेक विद्यार्थी शाळेतच येऊ शकले नाही तर अंतर्गत मूल्यमापन कसे करणार, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्याला पर्याय म्हणून ऑनलाइन वर्ग घेण्यात आल्याचे शासनाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात ऑनलाइन वर्गात नेटवर्कचा खोडा राहिलेला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल तसेच नेटवर्क ही समस्या राहिली आहे. शहरी भागातील श्रीमंत पालकांच्या मुलांना गृहीत पकडण्यात आले. यात ग्रामीण भागातील विद्यार्थांची नोंदच घेण्यात आली नाही. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या पिटीशनला उत्तर देण्यासाठी सरकारने आपली बाजू राखली तर नाही ना, अशी शंकादेखील कोहाडे यांनी उपस्थित केली आहे.