शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारचे काम; श्रेयासाठी धडपड

By admin | Updated: October 5, 2014 23:06 IST

गेल्या १५ वर्षात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने केलेल्या विकास कामांचे श्रेय निवडणुकीच्या तोंडावर घेण्यासाठी काँग्र्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरसावले आहेत.

गडचिरोली : गेल्या १५ वर्षात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने केलेल्या विकास कामांचे श्रेय निवडणुकीच्या तोंडावर घेण्यासाठी काँग्र्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरसावले आहेत. आमच्या मंत्र्यांमुळेच ही कामे झाली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस करीत असला तरी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच गडचिरोलीसारख्या दुर्गम व अतिदुर्गम भागाच्या विकासाला चालना दिली. विदर्भ विकास कार्यक्रम हा मुख्यमंत्र्यांचाच होता, असा दावा काँग्रेस आता प्रचारात करू लागली आहे. गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसचे दोन व एक अपक्ष आमदार आहेत. काँग्रेसचे दोन आमदार आरमोरी व गडचिरोली क्षेत्रात विकासासाठी धडपडत होते व त्यांनीच विकासाची कामे खेचून आणली. त्यामुळे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे १०० खाटांचे महिला व बाल रूग्णालय, प्रत्येक तालुक्यात शासकीय कार्यालयांना स्वतंत्र इमारत, चामोर्शी तालुक्यात चिचडोह बॅरेज सिंचन प्रकल्प हे सारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात पूर्ण करण्यात आले. आरमोरी विधानसभा क्षेत्रात कोसरी व येंगलखेडा हे दोन मोठे सिंचन प्रकल्पही मार्गी लागलेत, असा दावा काँग्रेसचा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर. आर. पाटील पालकमंत्री असल्याने त्यांनीच हे सारे केले, असे सांगत आहेत. पाटील यांच्या प्रयत्नामुळे दोन राज्यांना जोडणारा गोदावरी नदीवरचा पूल सिरोंचा तालुक्यात निर्माणाधीन आहे, असा राष्ट्रवादीचा दावा आहे. तर हा केंद्रात असलेल्या डॉ. मनमोहन सिंग सरकारने मंजूर केलेला आहे, असा काँग्रेसचा दावा आहे. आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात केवळ अधिकाऱ्यांचेच राज्य होते. त्यांचेच ऐकून आर. आर. पाटील जिल्हा विकासाचे काम करीत होते, असेही आता काँग्रेसचे नेते जाहीररित्या बोलू लागले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळला. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता होती. विकासाचे एक तरी ठोस काम सांगा, असा थेट सवाल काँग्रेसचे नेते आता करू लागले आहे. काँग्रेस पक्षाकडेच विकासाचे व्हिजन आहे. आजवर गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेसनेच प्रामाणिक प्रयत्न केले आहे. हे जनता विसरणार नाही, असाही प्रचार आता जोर धरत आहे. १० टक्के कमिशन विकास कामावर घेण्याची आमची संस्कृती नाही, असा टोला काँग्रेस नेत्यांनी विरोधकांसह १५ वर्ष आपला सहकारी राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही लगावला आहे. गडचिरोली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय आणण्याचे काम गडचिरोलीच्या विद्यमान आमदारांनीच केले, असेही काँग्रेस सांगू लागली आहे. एकूणच राज्य सरकारच्या गेल्या १५ वर्षातील सर्व कामावर काँग्रेस आपला दावा सांगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही या कामाचे श्रेय घेत आहे. धर्मरावबाबा आत्राम मंत्री असतांनापासून या सर्व कामांचा पाठपुरावा करण्यात आला, अशी मल्लीनाथी राकाँ करीत आहे. मात्र गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील जनतेला विकासाचे खरे कर्तबगार लोक पुरूष कोण आहेत, याची जाण आहे. त्यामुळे जनता या साऱ्या दाव्यांकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने पाहत असून कोणते लोकप्रतिनिधी व पक्ष खऱ्या अर्थाने विकासभिमूख होते, याचीही जाण मतदारांना आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार असलेल्या विद्यमान आमदारांनी आपल्या मतदार संघात झालेले सर्व काम आपल्यामुळेच झाले. आपण सरकारकडे पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक गावात वीज आली. पाणी पोहोचले, असा दावा केला आहे. एकूणच दावे, प्रतिदावे रंगत आहेत. मतदार राजा सर्वांचा एकूण काय तो निर्णय घेईल, त्याचा निर्णय १९ आॅक्टोबरला कळेल. (जिल्हा प्रतिनिधी)